बारामती दि २३
बारामती आणि पुरंदरच्या सीमेवरती असलेल्या एका कंपनी चा खतनिर्मिती प्लॅण्टमुळे नीरा बारामती रस्त्यावर ती प्रवास करणार्या प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत .
काल दिनांक २२ एप्रिल रोजी बारामती आणि पुरंदर तालुक्यात अवकाळी च्या पहिल्या पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे नीरा बारामती रस्त्यावर ती रस्ता निसरडा झाल्याकारणाने असंख्य नागरिकांची वाहने घसरून अपघात झाले यामध्ये अनेक प्रवासी यांना दुखापत झाली तर अनेक चारचाकी वाहनांचे अपघात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे .
निंबूत गावाच्या वेशीवर असणार्या या कंपनीमधून रस्त्याच्या विरूद्ध बाजूस असलेल्या खतनिर्मिती प्लॅन्टसाठी नीरा बारामती रस्त्यावरून कच्च्या मालाची वाहतूक केली जाते तसेच या खतनिर्मिती फ्लॅटमधून तयार होणार्या खताची वाहतूक या नीरा - बारामती रस्त्यावरून केली जाते या वेळेस वाहतूक करत असताना .हे खत काळपट दिसणारे व चिकट असते क्षमतेपेक्षा जास्त हा कच्चा माल व खत भरले जाते आणि ते त्या प्लॅन्टला पोचवले जात असताना रस्त्यावरची पडते पण तेव्हा चिटकून राहते कालांतराने पाऊस झाल्यानंतरही त्याचा पुन्हा चिखल होतो आणि मग त्या कारणाने या रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहने हे घसरतात यामुळे अनेक अपघात घडले असून .
काल तब्बल जवळपास पन्नास ते साठ दुचाकीस्वार या निसरड्या रस्त्यावरून घसरून पडले आणि त्यांना दुखापत झाली आहे तसेच चारचाकी वाहनांचीही या निसरड्या रस्त्यामुळे समोरासमोर धडकल्या असून वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वाहनमालकांनी कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले असून ही घटना घडत असताना अनेक स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी कंपनीच्या सुरक्षा विभागाला अग्निशामक दलास पाचारण करून हा रस्ता स्वच्छ करण्याची विनंती केली पण त्याकडून कंपनीच्या सुरक्षा विभागाने दुर्लक्ष केले आहे.कंपनीच्या अशा मुजोर भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी आता थेट राष्ट्रीय प्रदूषण नियामक मंडळाकडे या कंपनीची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
COMMENTS