सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
शेतकरी कर्जात जन्मतो आणि कर्जात मरतो असे अर्थशास्त्र सांगते.ही वास्तवता आहे त्याला कारण सरकारची अनास्था, शेतकऱ्यांचा असंघटितपणा, राजकिय पक्षांवर वांझ निष्ठा याशिवाय शेतकरी बांधव म्हणून एकमेकांकडे पाहण्याचा द्वेषात्मक दृष्टीकोन या बाबींमुळे आजही शेतकरी घटक अस्वस्थतेच्या गर्तेत फिरत आहे.
तो बाहेर येणे मुश्किल आहे. म्हणायला तो लाखाचा पोशिंदा आहे.आज उन्हाळ्याचा कहर आहे.ज्याच्याकडे पाण्याचा स्रोत आहे. त्याने मका केली आहे. पिकवणारा शेतकरी आहे आणि विकत घेणाराही शेतकरीच आहे.मका प्रतिकुल परिस्थितीत मोठी करण्यासाठी किती पाणी द्यावे लागते. किडनाशक औषधे फवारावी लागतात, टाॅनिक,खते टाकावी लागतात ही सर्व प्रक्रिया मका विकत घेणाऱ्या गायगोठा असणाऱ्या शेतकऱ्यांला माहित असते पण तोही मका पिकवणाऱ्या शेतकरी बांधवाला कांहीही त्रुटी सांगून अतिशय कमी भावात मका विकत मागतो मग बाजार कमिटीतील व्यापाऱ्यांना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे.येथे शेतकरीच शेतकऱ्यांची नागवणूक करीत आहे यामुळे शेतकऱ्याची अर्थिक प्रगती होताना दिसत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ अशी म्हणण्याची वेळ आली आहे मग शेतकरी स्वतःच्या पायावर दगड मारुन घेत आहे मग सांगा शेतकऱ्यांची प्रगती होणार कशी? हे येथे लिहिण्याचे प्रयोजन की शेतकरी बांधवांनी चिंतन करावे.हा माझा स्वानुभव आहे.कल्पना विलास नाही.या बाबीवर सडेतोड,परखड विचार मांडावेत ही अपेक्षा आहे.
--------------
श्री.एस.एस.गायकवाड सर
करंजेपूल मो.नं.७७६८०९८२९६
लेखक सेवानिवृत्त उपप्राचार्य आहे...
COMMENTS