सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
प्रतिनिधी
वाई तालुक्यातील ११७ गावातील पथदिवे गेली अनेक दिवसापासून वीज बिल न भरले गेल्याने बंद केले गेले आहेत. ऐन पावसाळ्यात सर्व ठिकाणी अंधार असल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना कारवा लागत आहे.पंचायत समितीच्या बेजबादार पणामुळे आणि महावितरणाच्या आडमुठपणामुळेच आज तालुका अंधारात असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला असून त्यांनी विभागाचा निषेध करत सोमवारी वाई पंचायत समिती, व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून येत्या चार दिवसांत पथदिवे सुरु न झाल्यास दोन्ही कार्यालयाना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनत म्हंटले आहे की,
मागील ३ दिवसांपासून तालुका अंधारात आहे मागील अनेक महिन्यांचे लाईट बिल भरले नसल्यामुळे महावितरण कडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार पथ दिव्यांचे बिल हे राज्यशासन भरणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र आपल्याकडून ह्या आदेशाचा अमल केला जात नाहीये असे निदर्शनास येत आहे. आज तालुक्यात सर्व गावांमध्ये पेरण्या चालू झाल्या आहेत. पाऊस तोंडावर आला आहे मागील वर्षी या मोसमात पाऊसमुळे भुसंकलान झाले होते. ज्या मुळे आणि नागरिक बेघर होऊन त्यांचे संसार उध्वस्त झाले होते. अश्या परिस्थिती असताना लोकांना आधार देण्याऐवजी आपण त्यांना त्रास होईल अशी भूमिका घेत आहेत. आणि त्याबद्दल आपला निषेध का करू नये ?.
आपण यावर तोडगा न कडल्यास आम्हाला सामूहिक आत्मदहन करावे लागेल आणि याला आपण जबाबदार असाल. असं म्हंटले आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता आरपीआय प्रदेश युवक आघाडीचे उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड याच्या नेतृत्वाखाली महावितरण व पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. बावधन नाक्यावरून मोर्चा काढण्यात आला. सुरवातील महावितरण कार्यालयावर मोर्च्या नेण्यात आला. याठिकाणी कार्यकर्त्यांनी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना स्वप्नील गायकवाड यांनी निषेध व्यक्त करत दोन्ही विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. शासन आदेशाचा संदर्भ देत ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा व वीज बिल हे शासनाने च भरवयाचे असताना त्यामध्ये दिरंगाई कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आरपीआय पक्षाने नेहमीच सामाजिक प्रश्नावर आंदोलने केली आहेत. रस्त्यावर उतरून नागरिकांना न्याय देण्याची आमची भूमिका राहिली आहे. आजचे आंदोलन ही त्याच्याच एक भाग असून महावितरणने येत्या चार दिवसात पथदिवे चालू केले नाहीत तर दोन्हीं कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी ही पंचायत समितीच्या गेटवर भाषण करताना केवळ बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे तालुक्यातील गावं अंधारत असल्याचे म्हणाले, ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवण्यात तालुका प्रशासना अपयशी ठरले आल्याचे सांगत त्यांनी पाऊसाचे दिवस असताना कोणालाही पूर्वसूचना न देता महावितरणणे वीज बंद कशी केली? पैसे भरण्याची जबादारी ही शासनची असताना त्यांनी याबाबत दिरंगाई का केली? असा प्रश्न केला.त्वरित सर्व गावातील पथदिवे सुरु करावते अन्यथा आरपीय आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला दोन्हीं विभाग जबादार असतील असं ते म्हणाले.
मोर्चात पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीनिवास घाडगे
जिल्हा संघटक, संतोष गायकवाड, काली घाडगे तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे शहर अध्यक्ष किरण घाडगे युसुफ बागवान, रुपेश मिसाळ, सूर्यकांत गायकवाड, रामभाऊ भोसले, नित्यानंद मोरे,बाजीगर बागवान, बजरंग भानसे, सचिन वायदंडे, सतीश चव्हाण, जोस्ना गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS