सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील ३२ गाव खोऱ्यातील डेरे -भुतोंडे ता.भोर परिसरात रविवार दि.१९ सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने धूळ वाफेवर पेरणी करून उगवण झालेल्या भात रोपांना तसेच पेरणी केलेल्या कडधान्य व इतर पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील डेरे - भुतोंडे परिसरातील खुळशी, गृहिणी, चांदवणे ,कुंबळे तसेच या भागातील अनेक गावांमध्ये पूर्वीपासूनच धूळ वाफेवर भाताचे तरवे तसेच भात व कडधान्य पेरणी केली जाते.यंदाही शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी भाताचे तरवे तसेच कडधान्य पिके पेरणी केली होती.या पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली असताना पिकांना पावसाची गरज असल्याचे चित्र होते.रविवारी झालेल्या पावसाने खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून पिके पिके जोमात येणार असल्याचे भुतोंडे येथील शेतकरी प्रताप गुलाबराव कंक यांनी सांगितले.
COMMENTS