सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
किसनवीर साखर कारखान्याचे नूतन संचालक किरण काळोखे यांच्या प्रयत्नातून खानापूर गावाने किसनवीर कारखान्याच्या भाग भांडवलाची १ कोटीकडे यशस्वी वाटचाल केली आहे संचालक किरण काळोखे व खानापूरच्या ग्रामस्थांनी किसनवीर साखर कारखाना येणाऱ्या गळीत हंगामात पुन्हा नव्या जोमाने व उमेदीनेसुरू करण्यासाठी भागभांडवल उभारण्यात महत्वपूर्ण योगदान देत वाई तालुक्यातील इतर गावांना एक प्रकारे ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले आहे.
किसनवीर साखर कारखान्याला जवळपास एक हजार कोटीं कर्जाच्या खाईत ढकलून पाच तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केलेल्या मदन भोसलेंची उन्माद सत्ता उलथवून टाकत सभासदांनी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडवून आणले यामध्ये खानापूर गावचे सुपूत्र,उद्योजक व मकरंद पाटील यांचे खंदे समर्थक किरण काळोखे याना संचालक होण्याची संधी मिळाली मदन भोसले यांच्या भ्रष्ट कारभाराने पुर्णतः चोथा झालेला किसनवीर सह. साखर कारखाना सुरू करण्याची जोखीम मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांच्या खांद्यावर आली$ देशभक्त किसनवीर आबांनी उभारलेली सहकारी चळवळ मदन भोसलेंच्या कर्तृत्वहीन करभारामुळे कोलमडून गेलेली वाई तालुक्यातील कष्टकऱ्यांची मातृ संस्था वाचवुन तिला गतवैभव प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य आमदार व चेअरमन मकरंद पाटील,जिल्ह्या बॅंक अध्यक्ष नितीनकाका पाटील व सहकाऱ्यांनी यांनी उचलले आहे त्यासाठी आबा नितीन पाटील सर्व संचालक मंडळाच्या साथीने पायाला भिंगरी बांधून भागभांडवल उभे करण्या साठी दिवसरात्र प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत लोकांचाही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. किसनवीर कारखाना गळीत हंगाम जोमात सुरू करण्यासाठी नूतन संचालक किरण काळोखे यांनीही एक कोटीकडे यशस्वीपणे वाटचाल करत जबाबदारी उचलून आपले कर्तव्य पार पाडले आहे अवघ्या चार ते पाच चौथाई क्षेत्र असलेल्या खानापूर गावामधील ग्रामस्थांच्या मदतीने संचालक किरण काळोखेनी रोख स्वरूपात तसेच सोसायटीच्या माध्यमातून ६५ लाख रुपयांचे भागभांडवल जमा केले असून लवकरच १ कोटीचा टप्पा पूर्ण करणार आहेत ३६५ नवीन सभासदांची नोंद करत किसनवीर साखर कारखाना येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरता खारीचा वाटा उचलत वाई तालुक्या मध्ये खानापूर गाव एक नंबर ठरले आहे उद्योजक व माजी सरपंच किरण काळोखेनी संचालक पदा ची धुरा जबाबदारीने सांभाळत आमदार मकरंद आबा पाटलांनी दाखवलेला विश्वास सार्थक केल्या ने सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
COMMENTS