सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
दौंड : संदीप नवले
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात उसाचे भरघोस उत्पादन होत असल्याने साखरेचे उत्पादन नियंत्रणात राहिले नाही.जर साखरेचे उत्पादन नियंत्रणात राहिले नाही तर साखर कारखानदारांच्या बरोबरच ऊस उत्पादक शेतकर्यांसमोर देखील मोठे संकट उभे राहील.म्हणूनच आता साखर उत्पादना बरोबरच इथेनाॅल निर्मिती झाली तर महागड्या पेट्रोलियमवर होणारे हजारो कोटी रुपये वाचण्यास मदत होईल.तीच रक्कम वीज व पाण्यावर खर्च केली तर पाण्याविना पडीक असलेल्या शेतजमीनीतून देखील चांगले उत्पादन घेता येईल.यासाठी गावोगावी बायोवेस्ट प्रकल्प हाती घेण्यात येऊन नव्या इंधन प्रणालीचा नवा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खाते मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सीबीजी गॅस प्रकल्पाचे उदघाटन तसेच कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की,ब्राझील,अमेरिका,कॅनडा या देशात शेती उत्पादनातून थेट इथेनाॅलचे उत्पादन वीस टक्यांपासून शंभर टक्के पर्यंत होत असून तेथे नव्या वाहनात शंभर टक्के तर जुन्या वाहनांमध्ये तीस टक्के इथेनाॅलचा इंधन म्हणून वापर करण्यात येत आहे.आपल्याकडे देखील मळी(मोलॅसीस) पासून इथेनाॅल उत्पादन होत असून याबरोबरच आता मका, गहू, बांबू यापासून देखील इथेनाॅल निर्मिती शक्य आहे.शेतकरी आता ऊर्जादाता बनला पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्याचे जीवन बदलणार नसून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यानंतर गावागावांमध्ये लाखो युवकांना रोजगार निर्मीती होऊन देश प्रदुषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.संघाचे संस्कार हेच जीवनातील खरी पुंजी असून राष्ट्रनिर्माण व स्वदेशी विचाराने प्रेरित होऊन संघाचा एक उत्तम स्वयंसेवक म्हणून पांडुरंग राऊत जनउपयोगी काम करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,माजी मंत्री विनोद तावडे,आमदार राहुल कुल, अशोक पवार,माजी आमदार रमेश थोरात,बापूसाहेब पठारे, सूर्यकांत पलांडे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे,प्राज कंपनीचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद चौधरी,उपाध्यक्ष बबनराव गायकवाड,प्रदिप कंद, सुमंत बापू हंबीर,सुरेश साठे,वासुदेव काळे यांच्यासह ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी मानले.
..........................................................................
ग्रीन हायड्रोजन इंधन म्हणून एक पर्याय.
ग्रीन हायड्रोजन हे देशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करणारे इंधन असून पाण्यातून हायड्रोजन वेगळा करुन इंधन निर्मिती झाल्यास हायड्रोजन वर चालणारी वाहने बाजारात आल्यास ध्वनी,हवा प्रदूषणाला आळा बसेल.
- मंत्री नितीन गडकरी.
COMMENTS