नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा....! वीर धरण ८० टक्के भरले : आज नीरा नदीत पाणी सोडण्याची शक्यता

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील वीर धरण ८० टक्के भरले असून सायंकाळपर्यंत ९० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
         नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या १०  दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 
            यावर्षी मान्सून पावसाने निरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आषाढी पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. आज दि १४ सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ४३० मीमी पावसाची नोंद झाली असून ४१.५१ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात ८६६ मीमी पावसाची नोंद झाली असून ३६.२५ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १६६ मी मी पावसाची नोंद झाली असून ७९.९३ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात १०१४ मी मी पावसाची नोंद झाली असून ६०.६९ टक्के धरण भरले आहे.
---------------------
नीरा खोऱ्यातील वीर धरण ८० टक्के भरले असून सायंकाळपर्यंत ९० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावातील लोकांनी सावधानता बाळगावी. 
संजय बोडखे 
कार्यकारी अभियंता फलटण
To Top