आपत्ती काळात सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे ! रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--    
भोर : संतोष म्हस्के
 गेली दोन वर्ष रायगड जिल्हा विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी व नियोजन योग्य प्रकारे केले आहे. आता संकट आलेच तर हे संकट आपल्या घरावरील संकट आहे, असे समजून सर्व शासकीय विभागप्रमुखांनी प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या सूचनेनुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून “अलर्ट मोड”वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महाड येथील बैठकीत केल्या. 
     महाड आणि पोलादपूर तालुका व शेजारील रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्हे यांच्यात आपापसात आपत्ती व्यवस्थापन समन्वय साधण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आंतर जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार भरत गोगावले व आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तर भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार सुरेश काशिद व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  महाड-पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यात येणाऱ्या आपत्ती निवारणासाठी शासनाकडून आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी दिली. 
                                    
To Top