सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील पिराचा मळा येथे शेतकरी चंद्रकांत तारू यांच्या गोठ्याला २८ ऑगस्ट आकस्मिक आग लागून गोठ्यातील ९ जनावरे दगावली होती.घटनास्थळी राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा संग्राम थोपटे यांनी पाहणी करून कुटुंबाला धीर दिला व शासकीय मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले होते.सोमवार दि.२६ आमदार संग्राम थोपटे यांनी जळीतग्रस्तांना आर्थिक साह्य म्हणून ५१ हजारांची मदत केली.
तारु कुटुंबाची सर्व परिस्थिती पाहता कुटुंबाचा उदरनिर्वाह दुधाच्या व्यवसायावर चालत होता. हा प्रसंग घडल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर ओढवलेल्या दु:खाच्या परीस्थीतीतून सावरण्यासाठी भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी कुटुंबीयांची भेट घेवून आर्थिक सहाय्य मदत केले.यावेळी आमदार थोपटे म्हणाले की झालेले नुकसान पाहता ही केलेली मदत अल्प असून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहू.यावेळी राजगडचे संचालक चंद्रकांत सागळे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक समीर सागळे,सुमंत शेटे,अमित सागळे,गणेश पवार,सादिक फरास, नगरसेविका,अमृता बहिरट,सोनम मोहिते,आशा शिंदे, पद्मिनी तारु,वृषाली घोरपडे,स्नेहा पवार, मा.नगराध्यक्ष तानाजी तारू, शहराध्यक्ष गजानन दानवले, मा.उपनगराध्यक्ष संजय जगताप,सचिन तारू उपस्थित होते.
COMMENTS