सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
देशात महागाई बेरोजगारीमुळे अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे केंद्र सरकार यातून मार्ग काढत नाही प्रादेशिक पक्षात ताकद राहिलेली नाही मात्र सर्वसामान्य माणसांच्या मनात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे काँग्रेसचा विचार बलिदान इतिहास परंपरा पुसून टाकता येणार नाही सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता ते गतवैभव मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी हिमतीने कामाला लागावे वाई तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस उभारी घेईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
बावधन तालुका वाई येथील कृष्णाई कार्यालय येथे वाई तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता प्रमुख मार्गदर्शन म्हणून माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते ते पुढे म्हणाले काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा इतिहास आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्यसैनिक किसनवीर यांच्या विचाराने वाई तालुक्याची जडणघडण झाली वाई तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी विलास पिसाळ यांच्यावर सोपवली आहे त्यांचे नेतृत्वाखाली वाई तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट होईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढवावा वाई तालुका अध्यक्ष विलास पिसाळ म्हणाले काँग्रेसच्या विचारधारेत वाढलेला कार्यकर्ता किती संकटे आली तरी काँग्रेस पक्षाची फारकत घेणार नाही आमची सर्वांची जबाबदारी आहे की पक्ष टिकवणे वाढवणे सर्वांना बरोबर घेऊन वाई तालुक्यात काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचू असा विश्वास विलास पिसाळ यांनी बोलून दाखवला यावेळी काँग्रेस प्रांतिक प्रतिनिधी राजेंद्र शेलार सेवादल अध्यक्ष प्रताप देशमुख माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे वाई तालुका युवक अध्यक्ष प्रमोद अनपट प्रदेश महासचिव जयदीप शिंदे किसन पक्षाचे धनराज कांबळे यांची भाषणे झाली सूत्रसंचालन अतुल संकपाळ यांनी केले आभार तेजपाल वाघ यांनी मानले कार्यक्रमास वाईचे माजी उपसभापती सुनील बाबर मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे माजी सरपंच हनुमंत पिसाळ मंजिरी पानसे बाळासाहेब कोठावळे सचिन काटे आकाश पोळ यांच्यासह वाई तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते