फलटण ! गणेश पवार ! नीरा उजवा कालवा अस्तरीकरण विरोधात १४ गावातील शेतकऱ्यांचा एल्गार...कोणत्याही परिस्थिती अस्तरीकरण होऊ देणार नाही

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  -
साखरवाडी : गणेश पवार
फलटण तालुक्यातील तडवळे बंगला ते रावडी या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या नीरा उजवा कालव्याचे सिमेंट अस्तरीकरणाचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आले आहे त्या अनुषंगाने ठेकेदाराने या ठिकाणी सध्यस्थीतीत नीरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने युद्ध पातळीवर अस्तरीकरणाचे काम सुरू केले आहे मात्र या  विरोधात फलटण तालुक्यातील सुमारे १४ ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हे काम तातडीने बंद करण्याबाबतचे ठराव संमत केले आहेत
  नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाविरोधात तडवळे तालुका फलटण येथे ग्रामस्थांच्या वतीने येथील हनुमान मंदिर पटांगणावर  विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी या ठिकाणी फलटण तालुक्यातील सुरवडी, तडवळे, साखरवाडी, खामगाव, कुसुर, मिरेवाडी, सासवड, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, घाडगे मळा, खराडेवाडी, भिलकटी, वडजल,निभोरे या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील शेतकरीवर्ग व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती  होती यावेळी झालेल्या ठरावांमध्ये अस्तरीकरणाबाबत विविध विषयांवर चर्चा करून काही ठराव संमत करण्यात आले 
           शासनाच्या वतीने  होत असलेले अस्तरीकरनाचे काम हे या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य उध्वस्त करणारे असल्याचा आरोप करून  या भागातील शेतकऱ्यांना भविष्यात आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याने कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरणाचे काम होऊ देणार नसल्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला कालवा अस्तरीकरणाचे दुष्परिणाम सांगताना शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले यामध्ये  कालवा अस्तरीकरण झाल्यास या ठिकाणी भविष्यात  विहिरी, बोअरवेल व  विंधन विहिरी यांचे पाझर बंद होऊन हे पाण्याचे स्त्रोत कायमस्वरूपी आटणार आहेत परिणामी 'कालवा उशाला व कोरड घशाला' अशी  अवस्था येथील शेतकऱ्यांची  होणार आहे  अस्तरीकरणामुळे  शेतीच्या पाण्याचा टंचाई बरोबर बहुतांशी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा कालव्यालगतच्या विहिरींमधून केला जात असल्याने  या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा तीव्र टंचाई   निर्माण होणार आहे  परिणामी याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर येणार आहे फलटण तालुक्याची   कायम दुष्काळी तालुका  अशी ओळख ही १०० वर्षांपूर्वी या भागातून हा कालवा वाहिल्याने पुसली असून खऱ्या अर्थाने हा भाग सुजलाम सुफलाम झाला होता मात्र अस्तरीकरणामुळे पाझर बंद झाल्याने या भागातील हजारो हेक्टर पिके जळून जाण्याचा धोका भविष्यात निर्माण होणार असल्याने  कोणत्याही परिस्थितीत या कालव्याचे अस्तरीकरण होऊ देणार नसल्याचा सर्वानुमते निर्धार व्यक्त करण्यात आला आहे  नीरा उजवा कालवा  संघर्ष समितीची स्थापना करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, जलसंपदा विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन त्वरित काम थांबवण्याबाबत आदेश करावा अशी विनंती करणार असल्याबाबतचे मत यावेळी शेतकऱ्यांनी मांडले.
To Top