Javali News l अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत : जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसिलदारांना निवेदन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यात अतिवृष्टी होवून झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई व घरांच्या झालेल्या पडझडीचे पंचनामे होवून जनतेला त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जावली तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने तहसिलदार हणमंत कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.
        जावली तालुक्यात मुख्यत्वे भाताचे पिक घेतले जात असले तरी त्याबरोबर सोयाबीन, भुईमुग, घेवडा, पावटा, नाचणी आदी पिके घेतली जातात. जुलै महिन्यामुध्ये पावसाने थैमान घातल्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला. अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली असून घरांचे नुकसान झाले आहे. सर्व सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे पंचनामे तात्काळ होणे गरजेचे आहे असे जावली तालुकाध्यक्ष साधु चिकणे यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन तहसिलदार हणमंत कोळेकर यांना देण्यात आले असल्याची माहिती साधु चिकणे यांनी दिली.  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव प्रकाश कदम उपस्थित होते.
To Top