सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री,
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व सासवड पालखी तळाची पाहणी केली. यात पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणांचा समावेश होता. यंदाच्या वारीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर स्नानगृहे व शौचालयांची व्यवस्था केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी जाहीर केले.
तसेच, पावसापासून बचावासाठी ठिकठिकाणी एकाच वेळी पाच हजार वारकऱ्यांना उभे राहता येतील असे वॉटरप्रूफ मंडप प्रथमच उपलब्ध करून दिले जातील, ज्यात मेडिकल आणि मसाजची सोय असेल. सासवड येथील पालखीतळ यापूर्वीच चांगला विकसित करण्यात आल्यामुळे येथे काही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.