सावधान...वाणेवाडीत येताय? मंग १५ दिवस प्राथमिक शाळेत राहावं लागेल.....
सोमेश्वरनगर दि १७ एप्रिल
बाहेरील गावावरून वाणेवाडीत येताय तर सावधान...कारण तुम्हाला १५ दिवस प्राथमिक शाळेत राहावे लागेल.याबाबत आज वाणेवाडी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
आज वाणेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांची मिटिंग पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक किशोर भोसले, उपसरपंच संजय जगताप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वाणेवाडी गावामध्ये आतापर्यंत पुणे आणि मुंबई वरून येणाऱ्यांची संख्या अधिक होती, यामध्ये विकासनगर या ठिकणी सर्वात जास्त बाहेरून लोक आले आहेत, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांनी मिळून या लोकांना क्वॉरेंटाईन केले होते, मात्र बाहेरून येणाऱ्यांची संख्या अजूनही थांबत नसल्याने आज ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. आज पासून वाणेवाडी गावातील गावठाण, दत्तवाडी, चव्हानवाडी, रामनगर, विकासनगर आणि मळशी या ठिकणी जर कोणी बाहेरून येणार असेल तर त्याला १५ दिवस गावातील प्राथमिक शाळेत मुक्काम करावा लागणार आहे.
त्यामुळे कोणीही आपल्या नातेवाईकांना बाहेरून बोलावून घेऊ नये. अन्यथा त्यांना शाळेमध्ये कॉंरंटाईन करण्यात येईल. व तिथेच 15 दिवस रहावे लागेल. गावाच्या निर्णयानुसार कोणीही गावात प्रवेश अथवा राहण्यास येऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. गावच्या निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक ज्या लोकांना होमक्वारंटायल केला आहे त्यांना भेटत आहेत. त्यांना सक्तीची तिकिद देत आहेत. आणि आपल्या सर्वांच्या सुचणे प्रमाणे आता नवीन येणाऱ्या लोकांसाठी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत व्यवस्था करत आहेत. ग्रामपंचायतने शाळेतील वर्ग स्वछ करण्यासाठी सुरवात केली आहे आता आपले सर्वांचे काम असे असेल की जो कोणीही बाहेर गावावरून येईल त्याची माहिती ग्रामपंचायतला देयची बाकी त्या व्यक्तीला शाळेत नेण्याची व त्याची आरोग्य तपासणी , जबाबदारी ग्रामपंचायत, प्रशासनाने व आरोग्य विभागाने घेतली आहे.
COMMENTS