राज्यातील एक लाखाच्या वर साखर कामगार उपाशी मरत आहेत- राजेंद्र तावरे
सोमेश्वरनगर
राज्यात किमान दोनलाख साखर कामगार वेगवेगळ्या सहकारी व खाजगी साखर कारखान्यात काम करीत आहेत त्यापैकी किमान एक लाख साखर कामगार असे आहेत कि त्यांना गेली अनेक महिने पगारच नाहीत. याबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती बारामती साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र तावरे यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
याबाबत राजेंद्र तावरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केलेल्या मेल मध्ये म्हंटले आहे, महाराष्ट्रात आपण करोनाच्या संकटाला अत्यंत चांगल्या पध्दतीने सामोरे जात आहोत त्याबद्द्ल आपले मनापासुन धन्यवाद.... आपण राज्यातील ऊस तोडणी कामगारांचाही प्रश्न मिटवला आहे त्याबाबतही धन्यवाद.... परंतु दुसऱ्या बाजुला राज्यात किमान दोनलाख साखर कामगार वेगवेगळ्या सहकारी व खाजगी साखर कारखान्यात काम करीत आहेत त्यापैकी किमान एक लाख साखर कामगार असे आहेत कि त्यांना गेली अनेक महिने पगारच नाहीत.
ते उपासमारी करत आहेत परंतु हि वस्तुस्थीती आपणा पर्यंन्त पोहचत नाही.
साखर कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्याकडे जाणीवपर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दि.31.3.2019 पासुन वेतन मंडळाची मुदत संपली आहे. त्यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चे झाले परंतु काहीही फरक नाही.ज्या कारखान्यांचे निलाव करुन विक्री झाली काही कारखाने भाडेतत्वावर चालवायला दिले अश्या कारखान्यातील साखर कामगारांचे पुनर्वसन केले नाही अश्या कारखान्याकडे काही कोटी रुपये साखर कामगारांचे थकित आहेत.आणी आता काही दिवसापुर्वी साखर कामगारांचा कारखान्याच्या कपँसिटी प्रमाणे इंदलकर समितीने दिलेल्या अहवाला प्रमाणे कामगार पँटर्न ( आक्रुती बंध ) तयार केलेला आहे.तो साखर कामगारांवरती अन्याय करनारा आहे त्यामुळे त्यास राज्यातील सर्व साखर कामगारांचा व साखर कामगार संघटनाचा विरोध आहे.तसेच विनाकारन साखर कामगारांना कर्जमाफीतुन वंचीत ठेवले आहे.
वरील सर्वच माहीती बाबत आपण साखर आयुक्त यांचे कडुन अहवाल मागवणेत यावा व वस्तुस्थीती नक्की काय आहे ते पहावे.
एक लाखा पेक्षा जास्त साखर कामगार पगारा विना उपाशी आहेत हि गोष्ट खरी आहे.त्यामुळे आपण साखर आयुक्ता कडुन राज्यातील किती कामगार पगारावाचुन वंचीत आहेत याची खाञी करावी व त्यावरती तातडीने उपाय योजना करावी अशी विनंती तावरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.
COMMENTS