-कारखान्याची तयारी सुरू-
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याचे गळीत दि.२७ रोजी संपत असून कारखाना स्थळावर असलेले ४ हजार ऊसतोडणी कुटूंबाना त्यांच्या गावी सुखरूप पोहचविण्यासाठी कारखान्याची तयारी सुरू झाली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील १६ करखान्यांपैकी १५ साखर कारखाने बंद झाले असून जिल्ह्यात एकमेव सोमेश्वर कारखाना सुरू आहे. किरोना च्या पार्श्वभूमीवर कारखाने बंद झाल्यावर ऊसतोडणी कामगारांना आपल्या गावी
सोडण्यासाठी ज्या त्या कारखान्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे दिसत आहे. आपण वाचत आहात सोमेश्वर रिपोर्टर .बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम २७ रोजी संपत असून दि २८ पासून कारखान्याने ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या गावी सोडण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत कार्यकारी संचालक यादव यांनी सांगितले की, सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची एकूण ४ हजार कुटुंबाची मिळून १० हजार ३०० ऊसतोडणी कामगारांची संख्या आहे. तर जनावरांची ८ हजार ५०० अशी आहे. यांना सुखरूप गावी पोहचविण्यासाठी कारखान्याकडे आत्तापर्यंत ४५० ट्रक आणि टेंपो ची आदी झाली असून एकूण ६०० वाहने लागणार आहेत. ऊसतोडणी कामगार, जनावरे आणि वाहनांची यादी सोमवारी साखर आयुक्तांना ऑनलाइन पाठविली जाणार आहे. सोमेश्वर कारखान्यावर राज्यातील १३ जिल्ह्यातून २९ तालुक्यातुन ४२५ गावातील हे सगळे ऊसतोडणी कामगार आहेत. साखर आयुक्त आयुक्त ही यादी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवणार असून पुण्याचे जिल्हाधिकारी ही यादी १३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना पाठवणार आहेत.आपण वाचत आहात सोमेश्वर रिपोर्टर .प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा निहाय या याद्या बनवण्यात आल्या असून ज्या गावातील तो ऊसतोडणी कामगार असेल त्या आदींवर सुरुवातीला गावच्या सरपंचाचे नाव आणि ऊसतोडणी कामगारांची नावे खाली असणार आहेत.
दि.२६ ते २८ या तीन दिवसात ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबाची मेडिकल तपासणी सुरू केली जाणार असून कारखान्याकडे मेडिकल अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने तपासणी उरकण्यासाठी बारामती आरोग्य केंद्राची मदत घेतली जाणार आहे. या कामगारांना तीन टप्प्यात गावाकडे पाठविले जाणार असून पाहिला टप्पा दि २९ रोजी गावाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.
COMMENTS