साखर कामगारांना ना कोणी भाऊ ना कोणी बहिण-राजेंद्र तावरे
माळेगाव प्रतिनिधी
ऊस तोडणी कामगारांच्या पाठीशी त्यांच्या भावाच्या रुपात राज्याचे मंञी मा.धनंजय मुंडे व बहिणीच्या रुपात माजी मंञी मा.पंकजाताई मुंडे ताबडतोब या ऊस तोडणी कामगारांच्या पाठीशी भाऊ , बहिणीच्या रुपात खंबिर पणे ऊभी राहत आहेत, आणि ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न राज्य मंञीमंडळात मांडुन तातडीने सोडऊन घेतले. माञ दुसऱ्या बाजुला साखर कामगारांचे प्रश्न सोडविणे साठी ना कोणी भाऊ......ना कोणी बहिण......अशि गत साखर कामगारांची झाली असल्याचे मत बारामती तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र तावरे यांनी व्यक्त केले.
राज्यातील साखर उद्योगात साखर कामगार व ऊस तोडणी कामगार हे महत्वाचे दोन घटक आहेत. आजच्या परस्थीतीत दोन्ही कामगारांवर प्रचंड संकटे ओढवली आहेत....
त्यातुन मार्ग काढणे साठी ऊस तोडणी कामगारांच्या पाठीशी त्यांच्या भावाच्या रुपात राज्याचे मंञी मा.धनंजय मुंन्डे व बहिणीच्या रुपात माजी मंञी मा.पंकजाताई मुंन्डे ताबडतोब या ऊस तोडणी कामगारांच्या पाठीशी भाऊ , बहिणीच्या रुपात खंबिर पणे ऊभी राहिली......
आणी ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न राज्य मंञीमंडळात मांडुन तातडीने सोडऊन घेतले.
माञ दुसऱ्या बाजुला साखर कामगारांचे प्रश्न सोडविणे साठी ना कोणी भाऊ......ना कोणी बहिण......अशि गत साखर कामगारांची झालेली आहे.
वास्तविक साखर पट्यातील मंञी व आमदारांची संख्या या महाराष्ट्र सरकार मध्ये सर्वात जास्त आहे. त्यातुनही साखर उद्योगाचा आधार घेऊन आमदार ,खासदार ,मंञी झाल्यांल्याची संख्यातर त्याहुनही जास्त आहे. परंतु काय करनार यांच्या मनातच साखर उद्योगा विषयी पाप आलेलं दिसत आहे.
यांना मराठी म्हणी प्रमाणे ऊस गोड लागलेला आहे तो ऊस यांना मुळापासुन खायचा आहे.
म्हणजेच साखर कारखाना सहकारी तत्वावर चालऊन यांना नको आहे...... शेतकऱ्यांच्या FRP व ऊस दराची झंझट.....
व साखर कामगारांचे वेतन मंडळाप्रमाणे पगार , बोनस , व ईतर सेवा शर्तीची झंझट.....
यांना हा वर्ग जेंव्हा गुलामगीरीत जाईल तेव्हांच आपल्याला आर्थीक व राजकिय दिवस चांगले येतील असे मनात पाप आलेले आहे.
जर हे पाप त्यांच्या मनात नसते तर केंव्हाच यांनी साखर कामगारांची बाजु घेतली असती साखर कामगारांना मान्य नसणारा कामगार पँटर्न केला नसता,नविन वेतन मंडळ बसवने साठी ञिपक्ष समिती गठीत केली असती.
असल्या महाकाय संकटात एक लाख साखर कामगार उपाशी बसलाय आणी आमचे हे मानलेले भाऊ आणी मानलेली बहिण एक चक्कार शब्द काढायला तयार नाहीत याच्या पेक्षा साखर कामगारांचे दुर्देव्य काय...?
आठ आठ , दहा दहा , महिने काम करुन घ्यायचे आणी त्याचा पगारच द्यायचा नाही या मुळे उपासमारी होऊन साखर कामगारांवर गुलागीरीची वेळ आली आहे उपासमारीची वेळ आली आहे.हि वस्तुस्थीती खरी आहे म्हणुन राज्याच्या मुख्यमंञ्याना वस्तुस्थीती कळविलेली आहे. व राज्यात खरंच किती साखर कामगार पगारावाचुन उपासमार करीत आहेत याची खाञी साखर आयुक्तांकडुन करुन घेऊन यावर उपाय योजना करनेची विनंती केलेली आहे.
राज्याचे मुख्यमंञी मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांना ईमेल द्वारे कळविले होते या बाबत पञ मिळाले व पुढील कार्यवाहीसाठी पञ संबधीत विभागाकडे पञ पाठविले आहे असा रिप्लाय मुख्यमंञ्यांचा आलेला आहे.
बघुयात साखर धंद्यातील सर्व मंञी मोहोदयांना व मुख्यमंञ्याना साखर कामगारांच्या बद्दल काय वाटते आहे.....
---------------------------
साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न प्रमुख्याने पुढील प्रमाणे आहेत.
1) साखर कामगारांच्या वेतन मंडळाची मुदत दि.31.3.2019 रोजीच संपलेली आहे.
2) पगार वाढी साठी शासना कडुन ञिपक्ष समिती त्वरीत गठीत होणे अपेक्षीत आहे.
3) थकीत पगारासाठी शासनाकडुन ठोस निर्णय होणे गरजेचे आहे.
4) बंद पडलेल्या साखर कारखान्यातील कामगारांचे पुनर्वसन होणे महत्वाचे आहे.
5)सेवा निव्रुत्त साखर कामगारांना अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळत आहे ति केंद्र सरकारने वाढवुन दिली पाहीजे.
6) सेवानिव्रुत्त साखर कामगारांची साखर कारखान्याकडे शिल्लक असलेले देणे रक्कम त्वरीत देणेत यावी.
7) ज्या साखर कामगारांना पंचविस हजार रुपये दर महा पगार असेल व ते शेतकरीही असतील तर त्यांना शासनाने दिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा लाभ घेता येणार नाही अशि शासनाने कर्ज माफी योजनेत अट टाकलेली आहे ति जाचक अट शासनाने ताबडतोब मागे घ्यावी.
COMMENTS