नशीब बलवत्तर म्हणून वाचले ऊसतोडणी कामगाराच्या कुटुंबाचे प्राण
सोमेश्वरनगर -दि २१
वाणेवाडी-मळशी रस्त्यावर एका ऊसाने भरलेल्या बैलगाडीचा टायर फुटल्याने ही गाडी १५ फूट खोल चारीत जाऊन पडली. यामधून कोणतीही जीवितहानी झाली नसून बैलगाडीचे दोन बैल जखमी झाले आहेत.
सोमेश्वर कारखान्याचा ऊस हंगाम अजून सुरू असून येत्या आठ दिवसात कारखान्याचा हंगाम बंद होत आहे. आज दुपारी मळशी येथून उसाचे भरलेली बैलगाडी कारखान्याच्या दिशेने येत असताना विठ्ठल जगताप यांच्या वस्ती जवळ खराब रस्त्यामुळे तयार फुटल्यामुळे गाडी थेट शेजारीच असलेल्या १५ फूट खोल चारीत जाऊन पडली. यावेळी घटनेचे प्रसंगावधान ओळखून ऊसतोडणी कामगारांसह त्याची पत्नी व दोन मुलांनी उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र खोल खड्यात गाडी पडल्याने गाडीचे बैल जखमी झाले आहेत, स्थानिकांनी मदत करून गाडीखाली सापडलेले बैल काढण्यासाठी मदत केली.
रस्ता होणार कधी, ग्रामस्थांचा सवाल
गेल्या अनेक वर्षांपासून वाणेवाडी मळशी या रस्त्याचे काम झाले नाही त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, यारस्त्यावर अनेक उसाच्या गाड्यांचे अपघात झाले आहेत तर गेल्या एकच महिन्यांपूर्वी रस्त्यावरून गाडी घसरल्याने राजेंद्र काकडे यांचा मृत्यू झाला आहे, याकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला आहे.
COMMENTS