ग्रामसुरक्षा दलाच्या जवानानी वीजवला वनवा

Pune Reporter

ग्रामसुरक्षा दलाच्या जवानानी वीजवला वनवा.

तरूणांच्या तत्परतेने वाचले हजारो वन्यजीव व औषधी वनस्पती.

नीरा :प्रतिनिधी सनी निगडे 
     शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. संकटाच्या वेळी हे सुरक्षादल लोकांच्या मदतीसाठी धावुन जात आहे. त्याच बरोबर हेच सुरक्षादल निसर्गाच्या रक्षणासाठी  सुध्दा प्रयत्न करीत आहे. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यरात्री डोंगराला लागलेली आग मोठ्या प्रयत्नाने विझजवली आहे. रात्रीच्या काळोखात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी आग विजवल्यानं निसर्गाच होणार मोठ नुकसान  टळल आहे.

      पुरंदर तालुका हा डोंगर द-यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात येथिल डोंगराना वनवा लागण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. काल पिंगोरी येथील डोंगराला मोठी आग लागली होती. दुपारी लागलेली आग वनविभागाने वीजवली. मात्र रात्री ११ वाजता ही आग पुन्हा भडकल्याचे लक्षात आले. यावेळी पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील १५ तरूणांनी ही आग विझवुन निसर्गाच व वन्य जिवांच होणार नुकसान  टाळले आहे. सात ते आठ फुट उंच असलेल्या ज्वाला असलेली आग जवानांनी मोठ्या धौर्याने विजवली.
#जाहिरात 
त्यामुळे या तरूणांच मोठ कौतुक करण्यात येत आहे. ही आग विजवण्यासाठी सिद्धार्थ शिंदे, दिनेश भोसले, संभाजी पवार, अक्षय चव्हाण, महेश शिंदे, प्रणव शिंदे, ओंकार शिंदे, किरण शिंदे, महेश शिंदे, शिवम शिंदे, रविंद्र शिंदे,अमोल शिंदे, राजेंद्र शिंदे, यांनी परिश्रम घेतले
त्यांना पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
---------------------------------------------------------------
बाळासाहेब गोलांडे (वनरक्षक जेजुरी)
'पिंगोरी येथील डोंगराला काल मोठी आग लागली होती. जवळ पास पन्नास एकर डोंगरावरील वनसंपदा यामध्ये नष्ट झाली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी ही आग विजवली. पण मध्यारात्री पुन्हा वनवा पेटला. यावेळी पिंगोरीतील ग्रामशुरक्षा दलाच्या जवानांनी तो विझवला. त्यामुळे मोठ नुकसान टळलं आहे. त्याच बरोबर वनविभागाला सुध्दा मोठी मदत झाली आहे. गेल्या वर्षी सुद्धा या तरूणांनी वनवा विझवण्यासाठी मदत केली होती. लवकरच या तरूणांना   वनविभागाकडून शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येईल. 
  -----------------------------------------------------------
राहुल शिंदे (पोलिस पाटील, पिंगोरी) 
पिंगोरी हे गाव डोंगर द-यांनी वेढलेले गाव आहे. अनेक औषधी वनस्पती व वन्यजीव येथे आहेत. वनव्यामुळे अशा वनस्पती नष्ट होतात. त्याच बरोबर अनेक प्राणी, पक्षी शुध्दा नष्ट होतात. हे होवु नये म्हणून ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून अनेक वेळा आग विजवली जाते. वन विभाग शुध्दा या भागात आग लागल्यास तातडीने येतो. पण गावातच अशी यंत्रणा असल्यामुळे वनव्यावर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यासाठी या तरूणांची मोठी मदत होते.
To Top