या रोगानं सगळी नाती संपवली....गावाकडं जाऊन तरी काय? लहान लेकरांपासून १४ दिवस वेगळं राहावं लागणार हाय...
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
या सालाला मायंदाळ ऊन हाय...
गावाकडे जाऊन तरी काय करणार...? कोरोनान रक्ताची नाती संपवली गावाला जाऊन लहान लेकरांना साधी मिठी पण नाही मारू शकत, इथून जाऊन तरी काय जीवावर दगड ठेऊन १४ दिवस वेगळं राहावं लागणार असल्याची भावना तांबाराजुरी ता पाटोदा जि बीड चे सोमनाथ तांबे आणि सविता तांबे यांनी व्यक्त केली.
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम जास्त दिवस चालला, म्हणून आमचा निम्मा उन्हाळा इथंच निघाला...गावाकडं जाऊन माणसं कशीबी जगत्याल. पाणीच नाय तर जित्राबं जगवणार कशी...? तळी, विहिरी आटल्यात. झाडाला हिरवा पाला बी नाय... ही प्रतिक्रिया
आहे, बीड जिल्ह्यातील मंगलवाडी गावातील आजिनाथ तोडकर आणि सविता तोडकर यांची. यावरून बीड-
उस्मानाबाद भागातील दुष्काळाची भीषणता लक्षात येत आहे. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम संपून दोन दिवस झाले. कारखान्याने शासनाच्या नियमानुसार या १० हजार ३०० ऊसतोडणी कामगारांची वैद्यकीय तपासणी करून काल पासून त्यांना गावाकडे जाण्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे ज्या ऊसतोड कामागरांना गावाकडे थोडीफार पाण्याची सोय आहे, अशी कुटुंबांची गावाकडे जाण्यासाठी
मात्र यातील बरीचशी कुटुंबे गावाकडे जात नाहीत. दरवर्षी मात्र कारखाना कधी बंद होतोय आणि
गावाकडे कधी जातो, या विचारात असणारा ऊसतोडणी कामगार मात्र या वर्षी गावाकडे जाण्यासाठी उत्सुक दिसत नाही. येथे राहून कमीत कमी माणसाला व जित्राबाच्या पोटाला पाणी तरी मिळेल, तर शेतावर कामाला जाऊन चार पैसे तरी मिळतात असे काही ऊसतोडणी कामगार सांगतात.
तसे पाहता ऊसतोडणी कामगरांना त्याच्या कष्टाच्या मोबदल्यात काहीच मिळत नाही.
ऊसतोडणीसाठी येताना पोटच्या गोळ्यांना, म्हाताऱ्या आई- वडिलांकडे ठेवून यायचे. इथं आल्यावरही सुख नाही. दिवसरात्र राब राब राबायचं. मुकादमाकडून
घेतलेली उचल पोटाला चिमटा काढून फेडायची. दिवाळी माहीत नसती की पाडवा, येणारे सगळे दिवस।सारखेच फक्त राबायचं एवढेच...त्यांच्या नशिबी
असतं, ऊस तोडाय येताना मुकादमाकडून एक ते दीड
लाख उचल घ्यायची, सहा महिने राब राब राबून पोटाला चिमटा घेत चटणी आणि शिळं भाकरी
तोडत कसेबसे लाखभर रुपये फेडायचं...असे चं ता. पाटोदाचे अप्पा पाहणे यांनी सांगितले.
आता या पैशातून मुलांची लग्न आणि मुलांच्या शा खर्च भागणार होता, त्यामुळे ऊसतोडणी कामागारांच्या चेहऱ्यावर समाधान होतं... सोयरं भेटू पुन्हा...' अशी
आपुलकीची भेट देत भरल्या डोळ्यांनी निरोप घेणाया
मजुरांच्या गहिवराने परिसर गलबलून गेला होता. हे
ऊसकामगार बीड, नगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून
हजारोच्या संख्येने कारखान्यावर ऊसतोडणीसाठी दाखल होतात. त्या भागात शेतीला पाणी नसल्याने जगण्यासाठी ऊस तोडण्याशिवाय त्यांच्याकडे
पर्याय नसतो. उसाचा हंगाम संपला असला तरीही गेल्या सहा
महिन्यांपासून येथील लोकांशी जोडलेली नाळ तोडताना
त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. आता गावाकडे जाऊन दुष्काळाशी दोन हात करायचं त्यातबी पाऊस पडला तर ज्वारी पेरायची आणि नाहीच पाऊस पडला तर पुन्हा मुकादमाकडून उचल घ्यायची आणि
कारखाना गाठायचा...अशी प्रतिक्रिया सवसवाडी ता शिरूरकासार जि बीड चे रमेश घायाळ यांनी दिली.
#जाहिरात
या वर्षी कोरोना आजार आला त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले पण सोमेश्वर कारखान्याने या वर्षी आम्हाला एक महिन्याचा किराणा माल दिला तसेच टनाला अनुदान म्हणून १०० रुपये दिले असल्याचे पिठठी ता पाटोदा जि बीड चे संदीप आणि विठ्ठल खिलारे यांनी सांगितले.
सोमेश्वर करखान्यावरून आलेल्या ऊसतोडणी कामगारांना गावात आले की त्यांची रीतसर तपासणी करून त्यांना घरी न जाऊन देता शेतात, अथवा गावापासून लांब १४ दिवसांसाठी क्वारेंटाईन करण्याचे चालू केले आहे. त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली आहे.
सरपंच- राधाकृष्ण तुपे
उपसरपंच- सुनील इंगोले
पिठठी ता पाटोदा जि बीड
COMMENTS