-ऊसाचे उच्चांकी गाळप करत सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
सोमेश्वरनगर दि 2
सोमेश्वर कारखान्याने गाळप हंगामात उच्चांकी गाळप, साखर पोती आणि साखर उतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ११.८५ चा सरासरी साखर उतारा ठेवत ९ लाख ३४ हजार ७८४ में टन उसाचे गाळप करून ११ लाख ४ हजार ४०० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेतले असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
#जाहिरात
जगताप पुढे म्हणाले, जिल्हात सुरुवातीपासूनच सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात सत्यात ठेवले होते. ११. ८५ साखर उतारा राखत कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे. चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असूनही शेतकी विभागाच्या वतीने उत्कृष्ट नियोजन केल्याने तसेच सुरुवातीपासूनच सभासदांच्या ऊस गाळपासाठी प्राधान्य दिल्याने हा हंगाम यशस्वी पार पडला. शुक्रवारी रात्री सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व अधिकारी उपस्थितीत गव्हाणीत नारळ टाकून हंगामाची सांगता करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरु झाला होता. जवळपास १६२ दिवस हंगाम सुरु होता. हंगामच्या अंतिम टप्यात लाखो रुपयांची उलाढाल कोरोनामुळे टप्प झालेली पाहायला मिळाली. आपण वाचत आहात सोमेश्वर रिपोर्टर.सर्वच व्यवसाय बंद असल्याने दुकानदारांना याचा मोठा फटका बसला.
सोमेश्वर कारखान्याचा वीज प्रकल्प आणि डिस्टलरी कारखान्याने वाचवलेल्या बॅगॅसमुळे पुढील ३० ते ४० दिवस सुरू राहणार आहे. डिस्टलरी प्रकल्पातून तयार करण्यात आलेले सॅनिटायझरची सुमारे ४० हजार लिटरची निर्मिती करून त्यापैकी ३६ हजार लिटर विक्री करण्यात आलेली आहे. भविष्यात व्यावसायिक दृष्टीकोणातुन आकर्षित पॅंकिग करून यासाठी वेगळी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी संचालकमंडळ प्रयत्नशील असल्याचे सांगत कारखान्याची गाळप क्षमता कमी व उसाचे क्षेत्र जास्त असल्याने हंगाम उशीरापर्यंत सुरु राहिला.आपण वाचत आहात सोमेश्वर रिपोर्टर .सभासदांचा ऊस वेळेवर संपविण्यासाठी ऊसतोडणी कामगारांना १ एप्रिलला ५० रुपये आणि १६ एप्रिलपासून १०० रुपये प्रतिटन अनुदान देण्यात आले. लॉकडाऊन मुळे ऊसतोडणी कामगारांना फटका बसू लागताच कारखान्याने दोन टप्यात सुमारे २५ लाख रुपयांचा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला. हंगाम बंद होताच शासनाच्या नियमानुसार ऊसतोडणी कामगारांना गावी पोहचविण्यासाठी कारखान्याने वैद्यकीय तपासणी करत ऊसतोडणी कामगारांना गावी जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
.
सहकारी साखर कारखाना चालवताना प्रत्येक घटक महत्वाचा असतो. सभासद, कामगार, अधिकारी, ऊसतोडणी, ऊस वाहतुकदार यांच्या सहकाऱ्याने सोमेश्वरने जिल्हाय प्रथम क्रमांकाचे गाळप केले त्यामुळे या सर्व यंत्रणेचे मी आभार मानत आहे. तसेच ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरने नेहमीच राज्यात नावलौकिक मिळवला आहे.
पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.
COMMENTS