१मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन विशेष
माळेगाव प्रतिनिधी
देशातील सर्वात प्रगतीशील आणि पुरोगामी विचारांचे राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे.राज्यातील नागरीकांना सरकारने करोनाच्या महामारीला सामोरे जाणेसाठी लाँकडाऊन केले.....तर दुसऱ्या बाजुला सरकारने करोनाच्या महामारीचे संकट साखर कामगारांनाही असताना.....शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहु नये , साखर कारखाने अडचणीत येऊ नयेत म्हणुन साखर कामगारांना कामावर येणेचे आव्हान करुन लाँकआऊट केले.....ते आव्हान साखर कामगारांनी न डगमगता , न भिता , जिवाची पर्वा न करता , अविरत कष्ट करुन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम पार पाडले......परंतु आज त्याच राज्यातील किमान एक लाख साखर कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे.....आता त्यांच्या कडे ना सरकार लक्ष देईना , ना राज्यातील एकही राज्यकर्ता......?साखर कामगारांवर उपासमारीचेमहाकाय संकटासाठी राज्यातील एकही घटक समोर येईना.....?हेच संकट आम्हांस करोनाच्या महामारी पेक्षा महाभंयकर वाटते......म्हणुनच आज पुरोगामी महाराष्ट्राच्या या महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी उपाशी पोटी हार्दिक शुभेच्छा कश्या देऊ.....?हा खरा प्रश्न माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पडलेला आहे.......?
एक साखर कामगार प्रतीनीधी.....
राजेंद्र शिवाजीराव तावरे - पाटील.
मु.पो.शिवनगर ( ताई गार्डन ) माळेगांव बु.ता. बारामती जि.पुणे.
मो.नं.9921200911.
COMMENTS