गुळुंचे रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
नीरा :प्रतिनिधी- सनी निगडे
गुळुंचे - राख रस्त्यावर नुकत्याच झालेल्या दुचाकी व चाराचाकीच्या अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीत जखमी झाला आहे. चारचाकी भरधाव वेगात दुचाकीला धडकल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, नीरा गुळुंचे रस्त्यावरील धोकादायक वळण, साईडपट्ट्यांचा अभाव व वाढलेली झुडपे अपघातास नेहमीच निमंत्रण देत आहेत.
याबाबत नीरा पोलीस दुरक्षेत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, नीरा राख रस्त्यावर मुलानकी येथे हा अपघात झाला. नीरा (ता.पुरंदर) येथील प्रभाग ४ मधील विजयकुमार विलास मेंढे हे इराटीका गाडी मधून निघाले होते तर दुचाकींवरून संतोष अखिलदास काळे व किशोर संतोष काळे हे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या गाडीने अचानक धडक दिल्याने संतोष अखिलदास काळे हे जागीच ठार झाले तर किशोर संतोष काळे हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गुळुंचे - राख रस्त्यावरील गुळुंचे हद्दीतील ओढ्यावरील पुलाला संरक्षक कठडे बसवावेत, रस्त्याच्या साईडपट्ट्या तयार कराव्यात, झुडपे काढावीत या मागणीसाठी गुळुंचे (ता.पुरंदर) येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन निगडे व संजय चव्हाण यांनी पुरंदरच्या प्रांतांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा असल्याने वेळीच आदेश देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, पुरंदर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली असल्याचे मत न्यायालयात मांडले तर निगडे व चव्हाण यांनी रस्त्याची सद्यस्थिती दाखवणारे फोटो न्यायालयात सादर केले होते. दोन्ही बाजूंनी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात विरोधाभास असल्याने न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी पुरंदरच्या तहसीलदारांना घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुर्दैवाने आजपर्यंत असा अहवाल सादर करण्यात प्रशासन हतबल ठरले आहे. चार महिन्यांपूर्वी येथील ओढ्यात चारचाकी पडून अपघात झाला होता. किमान प्रशासनाने आतातरी गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे.
COMMENTS