जयश्री शहा यांचे निधन.
पुरंदर : प्रतिनिधी
निरा ता पुरंदर येथील वैभव जनरल स्टोअर्सच्या संस्थापिका जयश्री जम्बुकुमार शहा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व एक मयत मुलाचा परिवार आहे.
जयश्री आजी यांनी नीरा बाजारपेठेमध्ये सर्वात पहिले स्टेशनरी, कटलरी व शालेय वह्या पुस्तकांचे दुकान टाकले होते. त्या काळी त्या रेल्वे व एसटी बसने प्रवास करून मोठ्या कष्टाने त्यांनी हे वैभव म्हणजेच वैभव जनरल स्टोअर उभे केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मनोज शहा व तनुजा शहा हे दांपत्य हा व्यवसाय पुढे चालवत आहेत. त्यांचा थोरला मुलगा हा पुणे स्थाईक आहे. तर द्वितीय चिरंजीव मागील काळात निधन पावल्याने तरीही त्या खचून गेल्या नाहीत. त्यांच्या कन्या ह्या सोलापूर येथे स्थायिक आहेत. हे सर्व परिवार सुस्थितीत असल्याने जयश्रीताई समाधानी होत्या. त्या काल परवा पर्यंत दुकानांमध्ये बसून असायचे स्वतः ग्राहकांची आस्थापूर्वक चौकशी करायच्या. ओळखीच्या लोकांचे तब्येतीची व इतर विचारपूस आवर्जून विचारायच्या. जयश्री आजी आज नीरा बाजारपेठेतून गेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी कायम ताज्या राहतील असे येथील ग्रामस्थांनी मत व्यक्त केले. अंत्यविधी दुपारी दोनच्या सुमारास होणार आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कृपया लोकांनी गर्दी करु नये. आम्ही आपल्या भावनांचा आदर करतो. शहा कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
जयश्री आजींना सोमेश्वर रिपोर्टर कडुन भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
COMMENTS