शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Admin
शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे : विभागीयआयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

 पुणे     : -   प्रतिनिधी

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामातशेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावीअशीसूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.

            विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप 2020-21 या वर्षातील खरीप हंगाम कर्ज वाटप व मान्सून कालावधीत धरणामधील पाण्याचे नियोजन व खबरदारीच्या उपाययोजना याबाबत विभागीय आयुक्तडॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओकॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आलीत्यावेळीत्यांनी या सूचना केल्याबैठकीला  विभागीय सहनिबंधक  संगिता डोंगरे, जलसंपदाचे मुख्य अभियंता विलास राजपूत, उपायुक्त संजयसिंह चव्हाणप्रतापजाधव, नैना बोंदार्डे, साधना सावरकर, त्रिगुन कुलकर्णी, जयंत पिंपळगावकर, पी.बी.पाटील  तसेच संबंधितबँकांचे अधिकारी उपस्थित होते.

            डॉम्हैसेकर म्हणाले, जिल्हयांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 योजनेतील पात्र खातेदारांच्या यादीतील खाती निरंक झालेल्या व न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाध्ये पीक कर्ज देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार पुणेकोल्हापूरसातारा,सांगली  सोलापूर या पाचही जिल्हयांतील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी व ग्रामीण भागातील बँकांनी पीक वेळेत पीक कर्जाचे वाटप करावे. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप असलेल्या बँकांचा विशेष आढावा घेवून इष्टांक पूर्ण करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनीही दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            मागील वर्षी पुण्याबरोबरच सातारासांगली कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती.या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊनये याची खबरदारी घेण्यात यावीमागील वर्षी विभागातसांगली  कोल्हापूर जिल्हयात गंभीर पुरपरिस्थितीउद्भवली होतीया पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारीयांनी धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट र्ण करुन घ्यावे.तसेच विभागातील पाचही  जिल्हयांच्या खरिप हंगामकर्ज वाटपाचा जिल्हानिहाय आढावा घेतला.शेतकऱ्यांना बि-बियाणे  खतांचा तुटवडा भासणारनाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावीअसे ते म्हणाले.

            यावेळी पुणेकोल्हापूरसातारासांगली सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवलकिशोर रामदौलत देसाईशेखर सिंहअभिजीत चौधरी,मिलींद शंभरकर यांनी आपापल्या जिल्हयात करण्यातआलेल्या  करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहितीदिलीतसेच खरीप हंगामपर्व करण्यात आलेल्यातयारीची देखील माहिती दिली.

To Top