सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई : संजय जगताप
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोना काळात तीन महिने पुरंदरच्या प्रशासनाने व आमदार संजय जगताप यांनी शर्तीचे प्रयत्न करत पुरंदरचा कोरनाचा किल्ला अबाधित ठेवला होता. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक फिरू लागले, त्यामुळे सासवडसह पुरंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काल शुक्रवारी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची तातडीची बैठक तहसील कचेरीत बोलून योग्य त्या सूचना ऐकून घेत काही ठोस निर्णय घेण्यात आले.
त्यामध्ये प्रामुख्याने तालुक्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मज्जाव घालण्यात आला आहे तर प्रत्येक व्यक्तीने तोंडावर मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे असा ठराव करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा संजय जगताप यांनी दिला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पुरंदर तहसील कार्यालयात सर्व पक्षाचे तालुका प्रतीनीधी, महसुली, आरोग्य, नगरपरिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक बोलवली होती. पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने आता काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आमदार संजय जगताप यांनी आव्हान केले. बैठकीत झालेले निर्णय पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, व संबंधित यंत्रणेला पत्राद्वारे कळवून कायदेशीर मार्गाने दंड कसा वसुल करता येईल हे यांचा पाठपुरावा करणार आहे.
जगताप पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत असताना लॉकडाऊन झाल्याने पुरंदरमध्ये त्या काळात रुग्णांची संख्या फारच कमी होती. पुरंदरच्या लोकांनी लॉकडाऊंनचे पूर्ण पालन केले. मात्र १ जून पासून लॉकडाऊन शितल झाल्यानंतर सासवडसह पुरंदरच्या काही गावांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाचे ३३ रुग्ण पुरंदर तालुक्यात झाले. त्यातील ११ पेशंट हे ऍक्टिव्ह आहेत तर इतर सर्व बरे होऊन घरी गेली आहेत तर सहा हजार पेशंट कॉरंटाइन आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता लोकांनी मास्क वापरले पाहिजे, लोकांना सोशल डिस्टंसिंग पळले पाहिजे, बहुतेक वेळा काय होते की बाहेरगावाहून येणारे लोक ते डायरेक्ट घरी येत आहेत, लोकांमध्ये मिसळत आहेत. प्रशासनाला कल्पना देत नाहीत, दोन तीन दिवसांनी समजते लोक बाहेर गावाहून आलेत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला पुरंदर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी या सर्वांना याठिकाणी एकत्र येऊन एकत्रित ठराव करून पास केला आहे; की पुरंदर तालुक्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या मान्यतेने अजितदादा पवारांच्या सहकार्याने त्यामध्ये असा ठराव करण्यात आला आहे. जो व्यती बाहेरून आलेला आहे त्यांनी २४ तासाच्या आत कोरोनाचे चाचणी केल्याचा अहवाल, संसर्ग नसल्याचा त्यांनी लेटेस्ट रिपोर्ट स्वतःच्या खर्चाने करून, ग्रामपंचायतीकडे द्यावा. कंपल्सरी त्यांनी त्याचा रिपोर्ट करावा किंवा प्रशासन त्याचे रिपोर्ट करेल मात्र त्याचा खर्च त्यांना करावा लागेल. जे व्यक्ती पुरंदर तालुक्यामध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बाहेर जात असेल त्या व्यक्तींनी महिन्यातून एकदा कोरोना रिपोर्ट करून घ्यावा आणि ते सर्टिफिकेट स्वतःकडे बाळगणे हे बंधनकारक करणार आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका यावर देखरेख करेल.
'पुरंदर तालुक्यातील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. पुरंदर तालुक्यातील ६३ शाळा कोरांटाईन सेंटर करण्याची व्यवस्था केली आहे. शाळा सॅनिटायझ करण्याचा गरजेचे आहे. शाळा सुरु करणे बाबत चर्चा करण्यात आली. शाळा सुरू होत असताना प्रत्येक मुलाला २ मास्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तर शाळे मध्ये मुबलक प्रमाणात सॅनिटायजर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्था, फाऊंडेशन, लोकसहभागातून सहकर्य अपेक्षित आहे.
'सर्वात मोठा निर्णय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न वापरणे याबद्दल ५०० रुपये दंड होणार आहे. याबाबत काटेकोरपणे सर्व लोकप्रतिनिधी, दोन्ही नगराध्यक्ष, ग्रामपंचायतीचे अधिकारी, सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि कोणीही राजकीय पुढाऱ्यांचा, पक्ष किंवा पदाधिकाऱ्यांचा फोन करायचा नाही. मास्क वापरला नाही व सार्वजनिक ठिकाणी थुंकले तर दंड केला जाईल. कारवाई व दंड सक्तीने वसूल करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कंपल्सरी मास्क वापरण्याची सक्ती आहे. कोणीही चुकलं तर त्याला शंभर टक्के दंड भरावाच लागेल. तालुक्यात मास्क न लावता व कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचा प्रकार दिसल्यास दंडनीय कारवाईला सामोरे जावे लागेल, त्यामध्ये मी स्वतः यामध्ये सहभागी असून मी जरी मास्क नाही लावला तरी माझ्यावर ही करावी करावी असे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी मास्कचा वापर करावा व शासनाने दिलेले नियम तंतोतंत पालन करावे. तुमच्या हलगर्जीपणामुळे तुमच्या परिवार, गाव, तालुक कोरोनाच्या धोक्यात घालू नाक, लोक सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.' असे आव्हान आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
COMMENTS