विवाह सोहळ्यात गर्दी केल्याने वरपिता व वधुपित्या विरुद्ध गुन्हा दाखल :
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोनाचा संसरर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळे व दुःखद प्रसंगी लोकांनी एकत्रीत न येता २० लोकांचं असे कार्यक्रम करावेत असा आदेश असतानाही त्याची पायमल्ली करत लग्नसोहळे केले जात आहेत. पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी व वनपुरी या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतानाही शासनाची कोणतीही परवानगी न घेता दोन्ही गावांतील लोक बिनदिक्कत पणे विवाह सोहळा करत होते. ते ही मर्यादे पेक्षा जास्त लोक जमवून. उदाचीवाडी येथील विवाह सोहळ्यात सासवड पोलीसांनी धडक कारवाई करत वरपिता व वधुपीत्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवार दि.१७ रोजी सासवड पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे उदाचीवाडी येथे विनापरवाना मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवून लग्न सोहळा चालू आहे. अशी माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे स्टाफ सह उदाचीवाडी येथे गेले असता, तेथे लग्न सोहळा चालू असल्याचे, गर्दी असल्याचे व सोशल डिस्टसिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने वरपिता राहणार वनपुरी व वधूपिता राहणार उदाचीवाडी यांच्याविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या लग्न सोहळा बाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
राहुल घुगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक सासवड
'याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की, कोणीही लग्नसमारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये विहित केलेल्या मर्यादेपलीकडे लोकांची गर्दी करू नये.'
COMMENTS