अन्यायकारक विज दर वाढ मागे घ्यावी : संकल्प वळकुंदे.
पुरंदर :प्रतिनिधी
'राज्यात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या आणि घरगुती ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक पद्धतीने वीज बिलामध्ये वाढ केलेली आहे. ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने व महावितरण कंपनीने ती त्वरित मागे घेऊन लॉकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावे.' अशी मागणी भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष श्री. संकल्प शिवाजीराव वळकुंदे यांनी केली.
तिघाडी सरकारच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभाराला जनता कंटाळली आहे. संपुर्ण राज्य लाॅकडाऊन मधे आर्थिक ताण सहन करत आहे. अशा परिस्थितीत मदत करायचे दुर पण त्यावर कडी म्हणुन महावितरण मार्फत मागिल महीन्यांची अव्वाच्या सव्वा बील पाठवुन सर्वसामान्यांच्या जिवावर भार टाकला आहे. महावितरणच्या या विजबिल वाढीवर सरकारने निर्णय घेऊन ती माफ करावीत या करिता आज पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चा वतिने आज नीरा उपविभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप सरचिटणीस श्रीकांत थिटे, युवा मोर्चा अध्यक्ष संकल्प वळकुंदे, संजय (काका) निगडे, उपाध्यक्ष सुरेंद जेधे, युवा नेते श्रीकांत ताम्हाणे, जेजुरी माजी अध्यक्ष अशोक खोमणे निलेश धुमाळ आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS