पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या किती :
कोरोना संदर्भात काय नविन नियम आहेत वाचा सविस्तर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासन सर्वतोपरी कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करत, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन नंतर बिगिनिंग अगेन अनलॉक टु सध्या सुरू केला आहे. त्या अनुषंगाने कोरोना सोबत लोकांनी वागावे लागणार आहे. आहे त्या परिस्थितीत जनजीवन सुरळीत ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी फक्त लोकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये महत्त्वाचं घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, खिशामध्ये सॅनिटायझर, गर्दीमध्ये जाण्याचे टाळा, गर्दिच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पोषण आहार द्यावा व व्यसनांपासून काही काळ दूर राहावे असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
दिनांक ३ जुलै रोजी संध्याकाळपर्यंत असलेल्या पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची थोडक्यात माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. ती पुढीलप्रमाणे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९८, मयत ३, बाधित (अॅक्टिव्ह) रुग्णांची संख्या ९५, उपचारांची घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २६ व सध्या कोरोनाचा इलाज व उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या ७२ आहे.
गावावर रुग्णांची संख्या जेजुरी येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले त्यामुळे शिल्लक शून्य. सुपे खुर्द येथे २ कोरोना रुग्ण आढळून आले होते ते आज रोजी त्यातील १ रुग्ण उपचारांती घरी आला आहे तर १ वर उपचार सुरू आहेत. कोडीत (खुर्द) तेथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तो उपचाराअंती आता घरी आहे. वीर येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावर उपचाराअंती तो घरी आला आहे. नाझरे सुपे येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तोही उपचारांची घरी सोडण्यात आले आहे. जवळार्जुन येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तोही उपचारानंतर घरी सोडण्यात आला आहे. मांढर येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह झाले होते त्यापैकी १ मृत्यू झाला होता, तर १ रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आला आहे. गुरोळी येथील ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले होती त्यापैकी १ व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर ५ रुग्णांच्या वर उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बोपगांव येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आली व त्याला घरी सोडण्यात आले आहे. माहूर येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावरही उपचार करण्यात आले त्यानंतर घरी सोडण्यात आले. पिंगोरी येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते पैकी २ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. खळद येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. खानवडी येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावरही उपचार सुरू आहेत, सोनोरी येथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते या तिघांवर ही सध्या उपचार सुरू आहेत. केतकावळे येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावर काही उपचार सुरू आहेत. कुंभारवळण येथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. धनकवडी येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्यावर काही उपचार सुरू आहेत तर कोरोनाचा हॉटस्पॉट होत असलेल्या सासवड येथील ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे, पैकी १ रुग्ण मृत झाला असून ६८ रुग्ण ॲक्टिव्ह झाले होते, पैकी ९ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत व त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर सध्या एकूण ५९ रुग्ण उपचार घेत आहेत.
पुरंदर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून काही नियम नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात येत आहेत. त्यासंदर्भात पुरंदर पंचायत समितीने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी आज पासून सुरु झाली आहे. यासंदर्भात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ साथरोग नियंत्रण कायदा ८९७ तसेच भारत सरकार गृह मंत्रालय दिल्ली यांच्या विविध निर्देशानुसार जे नागरिक मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना किंवा थांबलेली असताना, गाडी चालवत असताना आढळून आल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन किंवा त्याशिवायही थुंकल्यास अशा व्यक्तींकडून ५०० ते १००० रुपये इतका दंड करण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने दंडाची ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ७ नंबरची पावती करावी व वसूल केलेली रक्कम ग्रामनिधी मध्ये जमा करावी. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास निदर्शनास आलेल्या संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच अनुषंगिक अधिनियमांची कारवाई करणे बाबत सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात येत आहे, असे पत्र पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुरंदर पंचायत समितीला पाठवले असून पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी हे पत्र प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवली असून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्देश काढले आहेत. तरी इथून पुढे लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आव्हान सोमेश्वर रिपोर्टर तर्फे करण्यात येत आहे.
COMMENTS