वाणेवाडीची कॉर्पोरेशन बँक असून 'अडचण' नसुन 'खोळंबा'
सोमेश्वरनगर : प्रतिनीधी
बारामती तालुक्यातल्या पश्चिम भागा बागायतीपट्टा आहे साखर कारखाने, मोठी शैक्षणिक संकुले, मोठ्या बाजारपेठाआहेत. त्यामुळे या भागामध्ये आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर असते. हे आर्थिक व्यवहार करण्यासाठी काही ठरावीक मोजक्या राष्ट्रीय बँका या परिसरामध्ये आहेत. त्यातीलच वाणेवाडी गावातील कार्पोरेशन बँक आहे. ही बँक खातेदारांना सेवा देताना दुजाभाव करत असल्याने ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. खात्याला नुसते आधार कार्ड लिंक करायचे असेल तर ते बारामतीला जाऊन करा असे सांगितले जाते. त्यामुळे वाणेवाडी गावातील कॉर्पोरेशन बँकेची हि असून 'अडचण' नसुन 'खोळंबा' झाली आहे.
सोमेश्वरनगर परिसरामध्ये मोठमोठी शैक्षणिक संकुले आहेत त्या शैक्षणिक संकुलांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती साठी या राष्ट्रीयकृत कॉर्पोशन बँकेत खाती उघडली आहेत पण या खातेदारांना या शाखेमधून आधार कार्ड लिंक करता येत नाही . बँकेकडून सांगितले जाते आपण बारामतीला जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या.त्यामुळे ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड व मानसिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाणेवाडी गावातील कॉर्पोरेशन बँकेची हि शाखा असून अडचण नसुन खोळंबा झाली आहे. परिसरातील इतर बँकांनी मात्र आधार लिंक व खाते उघडणे साठी याच ठिकाणच्या ई-सेवा केंद्रांना अधिकार दिले आहेत. वाणेवडीतील कॉर्पोरेशन बँक या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेली आहे .
शाखेच्या जवळ असलेले एटीएम मध्ये कायमच खडखडाट असतो .पैसे उपलब्ध नसतात .
*त्याचबरोबर या शाखेमध्ये खाते आहे त्या ग्राहकांना नवीन एटीएमची मागणी केली असता ते तीन तीन महिने उपलब्ध होत नाही. त्यामुळे या शाखेतील कर्मचारी नक्की काय काम करतात ? असा प्रश्न खातेदार उपस्थित करताहेत
या बँकेत खाते उघडणाऱ्या खाते धारकांना गुगल अथवा फोन पे किंवा इतर काही डिजिटल अॅपमधून पैसे पाठवता येत नाही त्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात ते सोडवण्यात ही ते हतबल आहेत. ही बँक युनियन बँक मध्ये विलीनीकरण झाली असल्याचे कारण दिले जाते.
त्याचबरोबर कॉर्पोरेशन बँकेत पीक कर्जासाठी ते शेतकऱ्यांना त्यांचे क्षेत्र (शेती) मॉर्गेज करून मागतात. कोणतेही पीक कर्ज अटी व शर्ती न लावता शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही ही बँक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी चक्क मॉर्गेज मागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खात्यावरून पैसे काढल्यावर अथवा भरले तर कधीकधी चार ते पाच दिवस मोबाइलवरती बँकेतील व्यवहाराचा मेसेज येत नाही
अनेक दिवसांपासून खातेदाराच्या विचारलेल्या प्रश्नाला एकच उत्तर दिले जात आमची बँक युनियन बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आली असून सुविधा देऊ शकत नाही असे सांगितले जाते म्हणजे युनियन बँकेमध्ये या सुविधा उपलब्ध नाहीत का ? असा प्रश्न आता खातेदारांना पडला आहे .
अधिकारी असतात आठ आठ दिवस रजेवर
बागायती पट्ट्यात असलेली कॉर्पोरेशन बँकेचे वाणेवाडी ही शाखा अति महत्त्वपूर्ण आहे यात अनेक शेतकरी ,ज्येष्ठ नागरिक, महिला विद्यार्थी, व्यापारी वर्ग ,ग्रामपंचायती यांनी राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे येथे खाती उघडली आहेत पण येथील बँकेमध्ये कर्मचारी, अधिकारी वारंवार सलग सततच्या सुट्टीवरती जात असतात त्यामुळे त्या जागी तात्पुरत्या स्वरूपाचा बदली अधिकारी नेमणूक करणे गरजेचे आहे .अन्यथा खातेदारांना दररोज साहेब कधी येणार ? असे प्रश्न विचारावे लागतात.
मुद्रालोन ची वसुली झाली का?
ज्या वेळेस कार्पोरेशन बँक वाणेवाडी या ठिकाणी नव्याने आली पंतप्रधान योजना, मुद्रा योजना व इतर शासनाच्या कर्जप्रकरण योजनेतून जलदगतीने करोडो रुपयांची कर्जप्रकरणे वाटप करण्यात आली. नवीन ग्राहक मिळावे म्हणून बँकेने खैरात वाटावी तसे करोडो रुपये वाटले होते. यात अनेकांनी आपले हात धुवून घेतले.
बँकेतील एका कर्मचाऱ्याने तर त्यांच्या गावातील लोकांना लाखो रुपयांची मुद्रालोन चे वाटप केले असल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS