आता लग्न समारंभात व अंत्यविधीत फक्त २० जणांना परवानगी : जिल्हाधिकारी
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोक कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवास करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडायची असल्यास लोकांच्या प्रवासार मर्यादा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी शुभकार्य व दुःखद घटनांन समयी लोकांनी एकत्रीत येण्यावर मर्यादा आणल्या आहेत. खालील आदेश दि. ९ जुलै पासून लागू झाले आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पुणे
कलम १४४ आदेश
१. लग्न, अंत्यविधी या कार्यक्रमांना फक्त २० जण उपस्थित राहू शकतात (मर्यादा ५० वरुन २०) (पूर्वीची ५० ची परवानगी असेल तरीही फक्त २० उपस्थित ठेवणे).
२. लग्नाला बाहेरच्या जिल्ह्यातील व्यक्तींना उपस्थित ठेवतां येणार नाही. अपवाद फक्त वर व वधू. (अन्यथा आयोजकांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होणार).
३. कन्टेनमेंट झोनमधील व्यक्तींना वरील कार्यक्रमास जाता येणार नाही (गेल्यास कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होणार).
४. बाहेरच्या जिल्ह्यामधून प्रवासी बस ने येण्यास बंदी.
५. लग्न समारंभास स्थानिक शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांमार्फत / पोलिसांमार्फत निगराणी करुन आदेशाचा भंग झाल्यास आयोजकांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल होणार.
६. लग्न समारंभ २० लोकांमध्ये घेणेयासाठीही तहसीलदार यांची परवानगी आवश्यक ( विनापरवानगी लग्न समारंभ गुन्ह्यास पात्र).
७. मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभास २० पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्यास कार्यालय सील करुन एन.ए. व बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार.
*वरील आदेश दि ०७/०७/२०२० पासून लागू*
COMMENTS