नीरा रयत संकुलातील कन्या शाळेच निकाल १०० टक्के.
नीरा केंद्रात कला शाखेत शिवम जगदाळे ८८.३० टक्के व विज्ञान शाखेत मिसबा शेख ८३.३९ टक्के मिळवून पहिले आले.
पुरंदर : प्रतिनिधी
नीरा येथील रयत संकुलातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व लीलावती शहा कन्या महाविद्यालय या दोन्ही शाळांचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. कन्या शाळेच्या १०० टक्के निकाल लागला असून महात्मा गांधी विद्यालयाचा किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९९.३० टक्के व कला शाखेचा ८९.०९ टक्के निकाल लागला आहे. किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेत शिवम अर्जुन जगदाळे ८८.३० टक्के व विज्ञान शाखेची कु. मिसबा सलीम शेख ८३.३९ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आले.
नीरा येथील रयत शिक्षण संस्थेचे सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. बारावी विज्ञान शाखेत एकूण १९ विद्यार्थिनी प्रविष्ट होत्या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. पहिले तीन क्रमांक पुढील प्रमाणे कु. नरुटे स्नेहा सचिन ६१.५ %, कु. धुमाळ सायली नामदेव ५७ %, कु. निगडे साक्षी दत्तात्रेय ५४.६%
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय फेब्रुवारी २०२०मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शखेमध्ये १४४ विद्यार्थी बसले होते त्यामध्ये १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर ९९.३० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचे पहिले तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे कु. शेख मिसबा सलीम ८३.६९ टक्के, जाधव गौरव दादा ७८.७६ टक्के व पवार अभिषेक समीर ७६.१५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचे १०९ विद्यार्थी बसले होते पैकी ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.०९ टक्के निकाल लागला आहे. कला शाखा पहिले तीन विद्यार्थी जगदाळे शिवम अर्जुन ८८.३० टक्के, कु. काकडे धनश्री संजय ८७.०७ टक्के, कु. दानवले पल्लवी महादेव८५.३९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख थिटे, पर्येवेक्षक जयंतकुमार दाभाडे तसेच, लिलावती रिखवलाल शहा कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा बोडरे मॅडम व पर्यवेक्षक उत्तम काळे यांनी अभिनंदन केले.
COMMENTS