उसाच्या वाजनातून मोळी बांधणी सामुग्रीचे फक्त एक टक्काच वजा करा : साखर आयुक्तांचे आदेश
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊसाच्या वजनातून मोळी बांधणी (बायडिंग मटेरियल) साठी वापरण्यात येणारी सामुग्रीचे क्विंटलमागे फक्त एक टक्काच वजावट करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहेत.
याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने राज्यातील सहकारी व खाजगी कारखान्यांना आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, असे निदशर्नास आले आहे की, साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनातुन मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन वजावट करतात याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयाकडे येत आहेत. यामुळे ऊस नियंत्रण आदेश, १९६६ मधील कलम (३) (३अ) (iii) मधील तरतुदीनुसार मोळी बांधणी करुन कारखान्यास ऊस पुरवठा झाला असेल तर मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन जास्तीत जास्त एक क्विंटल ऊसामागे १ किलो (१%) वजावट केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा
साखर(आयुक्त) यांचे मान्यतेने करावयाची तरतुद आहे. वरील प्रमाणे कायदेशीर तरतूद असताना साखर कारखाने मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामग्रीचे १ % पेक्षा जास्त वजन ऊसाच्या वजनातून घट करतात अशी तक्रार करण्यात आलेली आहे. ही बाब विचारात घेता सर्व साखर कारखान्यांना सूचना देणेत येते की, मोळी बांधणी वापरलेल्या सामग्रीचे वजन ऊसाच्या वजनातून घट करताना ऊस नियंत्रण आदेश, १९६६ मधील कलम (३) (३अ) (iii) नुसार कार्यवाही करावी.
COMMENTS