सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सध्या संपूर्ण देशात कोव्हीडने धुमाकूळ घातला असुन भारतातहि दुसरी लाट वेगाने पसरत आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणजे सरसकट लसीकरण हा आहे. लसिकरणामुळे वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात येईल व रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होईल. सध्या १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण चालू होणार आहे.
तरी हि लस कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये याविषयी माहिती देणार आहोत.
लस कोणी घेऊ नये
गरोदर महिला
स्तनपान करणाऱ्या महिला
ज्यांना तीव्र स्वरुपाची ॲलर्जी आहेत त्यांनी
सर्दी, ताप, अंगदुखी, अशी लक्षणे असणाऱ्यांनी घेऊ नये.
लस कोणी घ्यावी
१८ वर्षांवरील सर्व महिलांनी घ्यावी.
ज्यांना आधी कोरोना झालेला आहे व त्यातून ते बरे झाले आहेत अशा सर्वांनी ८(आठ) आठवडयानंतर लस घ्यावी. ज्यांना हृद्य, किडनी, थायरॉयड यासंबंधी आजार आहेत. एचआयव्ही पेशंट्स यांनी लस घेण्यास हरकत नाही. पाळी चालू असताना पाळीच्या कोणत्याही दिवशी हि लस घ्यावी. ज्यांची गर्भधारणेसंबंधी ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी लस घ्यावी.
डॉ. तेजश्री अमोल जगताप
स्त्री रोग तज्ञ .
सानवी हॉस्पिटल, करंजेपूल
COMMENTS