सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
भुंईज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कवठे शिरगाव आणी अनवडी या ३ गावांन मध्ये चोरट्यांच्या टोळीने अंदाजे १५ कुलूप बंद असणारी घरे फोडून दहशत निर्माण केल्याने नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .अशी अज्ञात चोरट्यांची टोळी भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांन मधील नागरीक नोकरी व्यवसाया निमित्ताने किंवा मुलांच्या शिक्षणा साठी गावातील आप आपली घरे कुलुप बंद करुन निघुन जातात
अशा घरांची टेहळणी करुन ति फोडण्या साठी
चोरट्यांच्या टोळ्या येवु शकतात अशी माहिती
भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे
यांना खबर्या मार्फत गेल्या महिन्यात प्राप्त झाली होती .खबरदारीचा ऊपाय म्हणुन कांबळे यांनी तातडीने सर्व बीट अंमलदारांन सह पोलिस पाटलांची बैठक बोलावून त्यात आप आपल्या गावातील ज्या ग्रामस्थांची घरे कुलुप बंद आहेत अशा घरांन मध्ये सोने चांदीच्या वस्तु
किंवा रोख रक्कम ठेवु नये अशी माहिती प्रत्येक बीट अंमलदार आणी पोलिस पाटलांनी
त्या त्या घर मालकाला कळविण्याचे आदेश आयोजीत बैठकीत दिले होते आणी प्रत्येक गावातील वॅटसप ग्रुप वर देखील हि माहिती पाठविण्याचे आदेश दिले होते तशी माहिती तातडीने ग्रुप पाठवुन नागरीकांना सतर्क केले
होते त्या मुळे बंद घरे फुटली असली तरी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही अशी माहिती अनवडी गावचे पोलिस पाटील असलेले दिपक गिरी .कवठे गावच्या महिला पोलिस पाटील असलेल्या सौ.वर्षा ससाणे आणी शिरगाव येथील पोलिस पाटील सौ.उज्वला भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .
कवठे ता.वाई येथील अरुण बाळुभाऊ पवार बळवंत शंकर मोरे गणपत लक्ष्मण कुंभार चंद्रकांत जनार्दन जगताप प्रकाश यदू कुडाळकर .तर शिरगाव येथील बाळु हरीबा भोसले लिलाबाई ढमाळ गोपीनाथ दशरथ भोसले राजेंद रामचंद्र वाघ भिकु सोनबा सावंत
मंगेश प्रतापराव भोसले संतोष जगदेव जगताप समीर सलाऊद्दीन पठाण (दुबई येथे राहतात )
आणी अनवडी नवीन गावठाण मधील हणमंत शिंदे आणी जालींदर शिंदे अशी तिनही गावातील बंद घरे फोटलेल्यांची नावे आहेत .
अज्ञात चोरट्यांच्या टोळीने बंद घरे फोडल्याची
माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास समजताच त्यांनी तातडीने कवठे शिरगाव आणी अनवडी या गावांन मध्ये हवलदार दत्तात्रेय धायगुडे शंकर घाडगे आनंदा भोसले सोमनाथ बल्लाळ प्रशांत शिंदे यांचे पोलिस पथक तयार करुन तातडीने घटना स्थळावर
पाठवुन घडल्या प्रकाराची माहिती घेऊन
अज्ञात चोरट्यांच्या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.पण पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले असता चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले असले तरी पोलिस पथके तपासा साठी रवाना झाली आहेत . १५ घरे फुटली तरीही त्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झाली नाही.
भुंईज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांन
मध्ये पोलिस रात्र गस्त घालत असतात पण या गस्त पथका प्रमाणेच प्रत्येक गावातील पोलिस
मित्र म्हणून ज्या तरुणांची नावे भुईंज पोलिस ठाण्यात आहेत अशांनी आता स्वताचे गाव
सुरक्षित ठेवण्या साठी पुढाकार घेऊन भुईंज पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाई
भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी केले आहे .
COMMENTS