एक नजर जिरायत भागात ! व्यथा बारामतीच्या जिरायत पट्ट्याची

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
सर्व जिरायत पटयातील नागरीकांनच्या वतीने गावातील राजकीय नेते याच्यासाठी आवाहान करण्यात येते की वर्षो न वर्षो पाऊस कमी पडल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी नागरीक, जनावरे यांची हाल अपेष्टा होत आहे आजही जिरायत पटयातील अनेक गावांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नाझरे धरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये अनेक गावे आहेत परंतु ते पाणी १५ दिवसानंतर येत आहे. व ते पाणी अशुध्द असल्याने आरोग्य धोकादायक आहे. जरी पाणी फिल्टर केले तरी फिल्टर मशीन बंद पडत आहेत एवढे अशुध्द पाणी आहे..
              बहुतांशी जि. प. शाळेमध्ये पाण्याची सोय नाही बाथरूम अवस्था दयनीय झालेली आहे. पाणी कमी असल्याने स्वच्छतेचा अभाव दिसुन येत आहे. मुलाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे कुठलेही राजकीय नेत्याचे लक्ष नाही. जि. प. व पंचायत समिती निवडणुका आल्याकी सर्व नेते पदासाठी इच्छुक असतात परंतु पाण्याविषयी ठोस उपाय योजना करण्यास पुढाकार घेतला जात नाही मिळातात फक्त आश्वासने अशी लोकांची धारणा तयार झालेली आहे. त्यामुळे लोकांच्यात असंतोष तयार झाला आहे.. पाऊसाने ओढ दिल्याने नागरीकांचे व जनावरांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत याकडे दुर्लक्ष केल्यास जिरायत पटयातुन जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत गावामधील नागरीक मतदानावरती बहिष्कार घालतील अशी परीस्थिती निर्माण झालेली आहे.
           तरडोली गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली असुन प्रशासन, राजकीय नेते या विषयात गांभीर्याने लक्ष देत नाहीत तरी सर्व नेत्यांना नागरीकांच्या वतीने आवाहान करण्यात येते की हे प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांच्यात आहे. 
-----------------------
नवनाथ जयसिंग जगदाळे
माजी सरपंच तरडोली विद्यमान सदस्य ग्रा.पं. तरडोली
To Top