सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पानशेत धरण खोऱ्यातील पोळे गावातील शेतकऱ्याचा वणव्यात आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ( ता.०३) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. तुकाराम भाऊ निवंगुणे (वय ६५) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मयत व्यक्तीचा मुलगा नितीन निवंगुणे यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली. माहिती देताना नितीन निवंगुणे म्हणाले, "घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये लाकडे घेऊन येतो असे सांगून गेलेले वडील बराच वेळ घरी न आल्यामुळे मी व माझी आई वडिलांना पाहण्यासाठी गेलो त्यावेळी आमच्या शेताजवळ वणवा लागल्याचे दिसले. यामध्ये शोध घेत असताना बांधाच्या खालच्या बाजूस शेतातील वणव्यामध्ये वडील पडलेले आढळले."
वडिलांना घेऊन वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी तुकाराम निवंगुणे हे ९५% भाजले असल्याने त्यांना मृत घोषित केले. पानशेत • परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा येथील कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पानशेत परिसरातील भागातील जनतेला आरोग्याबाबतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.