सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसातील संततधार पावसामुळे वीर धरण पाठोपाठ आता गुंजवणी धरण भरले असून नदीपात्रात २०० क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
गुंजवणी धरण जलाशय पातळी वाढत असून विद्युतगृहातून 200 cusec विसर्ग चालू करण्यात येणार आहे.तरी पावसाच्या तीव्रतेप्रमाणे विसर्ग कमी/जास्त होईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील...
-सहाय्यक अभियंता (श्रेणी-१)
गुंजवणी प्रकल्प
COMMENTS