सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावळी तालुक्यात नेहमी सामाजीक कार्यात सतत कार्यरत असलेले जावळी मित्र मेढा फौडेशन तर्फे जावली तालुक्यातील ५४ गावांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न असणारे बोंडारवाडी धरण व्हावे या जनजागृतीसाठी यांच्याकडून सण उत्सवात विविध गावात जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे
बोंडारवाडी धरण हा सध्या जावली तालुक्यातील सर्वाधिक महत्वाचा विषय असून गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाच्या मंजुरीसाठी बोंडारवाडी ते चिंचणी, म्हाते ते धनकवडी या एकूण ५४ गावातील जनता लढा देत आहे. हे धरण लवकरात लवकर झाल्यास तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. जावलीतच शेती उद्योग तसेच इतर उद्योग धंदे वाढतील व पर्यायाने कामधंद्यासाठी जावलीतील तरुणांचा स्थलांतरित व्हावे लागणार नाही. याच प्रमुख गोष्टींवर प्रबोधन करत धरण प्रश्नासाठी ५४ गावातील जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे व धरणाविषयीची जनजागृती प्रत्येक गावात व्हावी यासाठी सण उत्सवाच्या काळात मित्रमेळा फाउंडेशन जावली या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पथनाट्य सादर करण्यात आलीत. राजकीय हेवेदावे, गटतट, मनभेद, मतभेद विसरून लोकांनी एकत्र यावे हा संदेश मित्रमेळाच्या सदस्यांनी यावेळी पथनाट्यातून दिला. चोरांबे, मामुर्डी, केळघर, म्हाते, कुसुंबी,डांगरेघर इत्यादी गावात पथनाट्य सादर करण्यात आली. ग्रामस्थ मंडळ, नवरात्र मंडळ मामुर्डी तर्फे सरपंच जगन्नाथ धनावडे यांचे हस्ते मित्रमेळा फाउंडेशनचे सदस्य याचा सन्मान करणेत आला
COMMENTS