सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : प्रतिनिधी
पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर आनेवाडी गावच्या जवळ असणाऱ्या उड्डाणं पुलावर महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने अवघ्या 20 मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली, ऐन उन्हाळ्यात सकाळी 11.20 मिनिटानी महामार्गवर द बर्निंग बसचा थरार पहावयास मिळाला सूदैवाने चालक वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी बस मधून सुखरूप उतरल्याने जिवीत हानी झाली नाही,
राधानगरी-कोल्हापूर वरून स्वारगेटकडे निघालेली विठाई बस क्रमांक MH 13-8413 क्रमांकांची बस पुणे बंगलूर आशियाई महामार्गावरून येत असताना येथील आनेवाडी टोल नाक्याच्या अगोदर असणाऱ्या आनेवाडीच्या उड्डाणं पुलावर बस आली असताना बसच्या इंजिन मधून धूर येऊ लागल्याचे चालक सागर चौगुले यांना दिसले असता क्षणात त्यांनी बस थांबवून वाहक सोनल चौगुले यांच्यासह सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले,काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली महामार्गवर यावेळी धुळीचे लोट पहाव्यास मिळाले बस मधे यावेळी चाळीसच्या वर प्रवासी प्रवास करीत होते
संपूर्ण बस जळून खाक झाल्या नंतर सातारा नगरपरिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी भुईंज पोलीस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवीली होती, आनेवाडी टोल नाका येथे अग्निशमक बंब कायम स्वरूपी असावा अशी मागणी अनेकदा स्थानिक लोकांनी केली होती