Baramati News l ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले..! अशा कुटुंबांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलाच फटका बसला आहे. 
      बारमती तालुक्यात तर पावसाने धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. अजित पवार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरल आहे, त्यांना १० हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर, निंबुडी परिसरातील नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेतली. अजित पवार म्हणाले, शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानाचे पंचनामे केले जात आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना धान्य देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या लोकांना १० हजार रुपये तातडीची मदत देणार आहोत. मदत वाटपास आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर वेळ पडल्यास सगळ्यांना मदत मिळेल, असेही अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.
To Top