सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने आता निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत निकषात न बसणा-या १९ लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.
आता राज्य सरकारने उत्पन्नाची पडताळणी सुरू केली असून त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. त्यामुळे आता अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या बहिणींचा निधी होणार आहे. सरकराच्या या निर्णयामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील २ लाख ३० हजार, ६५ वर्षांवरील १ लाख १० हजार, चारचाकी वाहन असलेल्या १ लाख ६० हजार, नमो शेतकरी योजनेचा लाभघेणाऱ्या ७ लाख ७० हजार, सरकारी नोकरदार २ हजार ६५२ लाभार्थीना लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. सर्व निकष काटेकोरपणे राबवले गेल्यास योजनेबाहेर होणा-या महिलांची संख्या लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.