सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नवी मुंबई : गणेश धनावडे
महापे एम बी पी विभागातील अनाधिकृत केबल टाकल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याचे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वार यांच्या अपघातात वाढ होत आहेत. अनेक केबल झाडांना गुरफटले असल्यामुळे पशू पक्षी यांना ही त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. पक्ष्यांना स्वतंत्र मनमोकळे जगण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी केबल इंटरनेटमुळे अडथळा निर्माण होत असल्याने अशा केबल त्वरीत काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष महापे विनोद शिंदे यांनी कोपरखैरणे इ विभागाचे सहआयुक्त यांना निवेदन देण्यात आले .
तसेच केबल टाकणाऱ्या कंपनीना कोणतेही परवानगी नसताना केबल वायरिंग टाकल्या जातात याचा जास्त फटका सर्वसामान्य लोकांना बसतो आणि अपघाताचे प्रमाण वाढू नये यासाठी महापे विभाग मनसे यांनी निवेदन देण्यात आले आणि आपण कोणतेही कारवाई न केल्यास केबल इंटरनेट वायरिंग विरोधात मनसे शैलीत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. याआधी त्यांनी एका अपंग महिलेचा पगार मनसे शैलीत मिळवून दिला होता पावणे महापे midc मधल्या एका कंपनी मध्ये अपंग महिला काम करत होती अणि त्या कंपनीने या गरीब महिलेचा सहा महिन्याचा पगार अडवून ठेवला होता,त्या महिलेचा पगार 64 हजार 400 रुपये पर्यंत निघत होता.तरी सदर महिलेला सोबत घेऊन त्या कंपनी मध्ये जाऊन कंपनी च्या मालका बरोबर प्रेमानी बोललो असता त्या मालकाने आज त्या महिलेचा संपूर्ण पगार तिच्या खात्या मध्ये जमा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापे विभाग विनोद शिंदे,उपशाखा अध्यक्ष हणमंत वाघमारे,उपशाखा अध्यक्ष प्रशांत डोंगरे,शाखा अध्यक्ष सचिन कर्नाळे,महाराष्ट्र सैनिक समि गुप्ता उपस्थित होते.