सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोरोनासारखी मोठी गंभीर परिस्थिती देशासमोर असताना देखील राज्यातील कारखान्यांनी शेतक-यांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करीत गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पाडला. ऊस गाळप करुन उत्पादित केलेली साखर, डिस्टीलरीमधील उपपदार्थ, कोजन मधील वीज ही मोठ्या प्रमाणात विक्री अभावी कारखान्यांकडे शिल्लक असुन कोरोनाच्या या जागतिक संकटाच्या पार्श्वभुमिवर साखर कारखानदारीस केंद्र सरकारने मदत करण्याचे धोरण राबवावे अशी मागणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली.
#जाहिरात
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, सध्या कोरोनामुळे लग्नसराई किंवा अन्य उत्सव बंद असल्याने तसेच मिठाई, चॉकलेट, कोल्डीक्स हे उदयोगही बंद असल्याने यासाठी जी साखरेची मागणी असते ती पुर्णतः थांबली असल्याने तसेच केंद्र सरकारकडुन जो साखरेच्या मागणीचा कोटा दिला जातो तो या मागणीच्या तुलनेने जास्त असल्याने, साखर कारखान्यांनी चालु हंगामात उत्पादित केलेल्या एकुण साखरेपैकी जवळपास ८० ते १०० टक्यांपर्यंत साखर ही गोडावूनमध्ये शिल्लक असुन त्यामुळे कारखान्याने उत्पादित साखरेपोटी बँकाकडुन घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत चालले असुन यामुळे कारखान्याची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.
COMMENTS