अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगास केंद्राने मदत करावी- पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोरोनासारखी मोठी गंभीर परिस्थिती देशासमोर असताना देखील राज्यातील कारखान्यांनी शेतक-यांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करीत गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पाडला. ऊस गाळप करुन उत्पादित केलेली साखर, डिस्टीलरीमधील उपपदार्थ, कोजन मधील वीज ही मोठ्या प्रमाणात विक्री अभावी कारखान्यांकडे शिल्लक असुन कोरोनाच्या या जागतिक संकटाच्या पार्श्वभुमिवर साखर कारखानदारीस केंद्र सरकारने मदत करण्याचे धोरण राबवावे अशी मागणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली.
#जाहिरात
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, सध्या कोरोनामुळे लग्नसराई किंवा अन्य उत्सव बंद असल्याने तसेच मिठाई, चॉकलेट, कोल्डीक्स हे उदयोगही बंद असल्याने यासाठी जी साखरेची मागणी असते ती पुर्णतः थांबली असल्याने तसेच केंद्र सरकारकडुन जो साखरेच्या मागणीचा कोटा दिला जातो तो या मागणीच्या तुलनेने जास्त असल्याने, साखर कारखान्यांनी चालु हंगामात उत्पादित केलेल्या एकुण साखरेपैकी जवळपास ८० ते १०० टक्यांपर्यंत साखर ही गोडावूनमध्ये शिल्लक असुन त्यामुळे कारखान्याने उत्पादित साखरेपोटी बँकाकडुन घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत चालले असुन यामुळे कारखान्याची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.
तसेच जागतिक बाजारपेठेत कच्या तेलाचे दर घसरलेले असल्यामुळे ऑईल कंपन्यांकडुन इथेनॉलचे करार झालेले असताना सुद्धा त्याची उचल होत नाही कारण लॉकडाऊन असल्याने डिझेल पेट्रोलचा खप कमी झाला आहे आहे. ऑईलच्या कमी दरामुळे इथेनॉल खरेदी करणे देखील आता ऑईल कंपन्यांना परवडणारे राहिलेले नसुन, ब्राझील सारख्या देशाने ऑईलच्या घटत्या मागणीमुळे यापुढे ईथेनॉल निर्मिती न करता साखर उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचसोबत देशी दारु विक्री बंद असल्यामुळे कारखान्याच्या डिस्टीलरीमध्ये उत्पादित होणा-या आरएसची मागणी घटली असुन यामुळेही कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जगताप पुढे म्हणाले की, देशातील कारखानदारी बंद असल्यामुळे वीजेची मागणी देखील कमी झालेली आहे तसेच हा लॉकडाऊनचा कालावधी भविष्यात किती दिवसाचा असेन हेही अत्ता निश्चित सांगता येत नाही याचा परिणाम कारखान्याने विज मंडळाला विक्री केलेले पैसे मिळण्यास विलंब होत आहे. या वरील सर्व बाबींचा विचार करीता एकुणच साखर कारखानदारी खुप मोठ्या आर्थिक संकटात जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने साखर, ईएनए, इथेनॉल निर्यात करण्यास परवानगी दयावी त्याचसोबत साखर कारखानदारीसाठी मदतीचे धोरण ठरवावे. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शेतकरी बांधवांनी सुद्धा येणा-या हंगामामध्ये ज्यादा ऊसाची उपलब्धता आणि अडचणी लक्षात घेवुन ऊस वाढवण्यापेक्षा इतर पिकांचा देखील पर्याय शोधला पाहिजे.सरकारने जर योग्य पर्याय काढला तरच सहकारी साखर कारखानदारी व शेतकरी हे या अडचणीला तोंड देवु शकतील असे जगताप यांनी म्हंटले आहे.