पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या व लॉकडाऊनच्या संदर्भात काय म्हणाल्या तहसीलदार
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी या नगर परिषदेच्या हद्दीतील रुग्णांची संख्या वाढत आहे. तर सोनोरी, उरुळी, केतकवळे, वाघापूर व इतर गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आज शनिवार ११ जुलै रोजी पर्यंत पुरंदर तालुक्यात कोरोनाचे एकुण १९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहेत, तालुक्यात कोरोनामुळे एकुण ६ जणांचा मृत्यू झाला आहे, एकुण ८३ रुग्ण उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहेत, तर १११ रुग्णांना आजही कोणाचे उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊन सुरू असताना पुरंदर तालुक्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नव्हता, मात्र लॉकडाउन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने अनलॉक वन - टू (बिगिनिंग अगेन) हे अवलंबले. त्यानंतर शहरी भागातील मूळचे पुरंदरकर गावाकडे येऊ लागले, तसेच पुरंदर तालुक्यातील चाकरमानी पुणे व इतर शहराकडे कामानिमित्त जाऊ लागले. निष्काळजीपणा मुळे त्यांना कोरोनाची लागण होऊ लागली. अगदी औषध निर्माण करणाऱ्या कंपनीतली कामगारही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सासवड जेजुरी सह ग्रामीण भागात त्याचा कोरोनाचा फैलाव सुरू झाला. आज रोजी कोरोनाचे १९३ रुग्ण झाले आहेत. पैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ८३ जणांवर उपचार करण्यात आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आजही १११ रुग्ण सासवड जेजुरी व पुणे येथील विविध कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
पुरंदर तालुक्यातील गाव निहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे सासवड ११६ तर १ मयत ६१ व्यक्तींना उपचारांती घरी सोडले तर ५८ रुग्ण उपचार घेत आहेत. जेजुरी येथील १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, पैकी १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १ रुग्णाचे उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर १० रुग्ण आज रोजी उपचार घेत आहेत. सोनोरी येथील १० रुग्ण पॉझिटिव्ह आले होते हे दहाही रुग्ण आज रोजी उपचार घेत आहेत. गुरोळी येथील ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. पैकी १ रुग्ण मृत्यू झाला आहे, पाच रुग्ण उपचार घेतल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. केतकावळे येथील ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. एका रुग्णावर उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे तर ४ रुग्ण उपचार घेत आहेत. वाघापूर येथील ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पाचही रुग्ण उपचार घेत आहेत. कुंभारवळण येथील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. चारी रुग्ण उपचार घेत आहेत. जाधववाडी येथील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ४ ही उपचार घेत आहेत. सुपे खुर्द येथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे, २ रुग्णांवर उपचार केलेल्या नंतर घरी सोडण्यात आले आहे. बेलसर येथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मांढर येथील दोन रुग्ण पॉझिटिव आले आहेत तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १ रुग्ण उपचार आंती घरी सोडण्यात आले आहे. पिंगोरी येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. १ रुग्णावर उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. वनपुरी येथील दोन रुग्ण पॉझिटिव आले होते. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धनकवडी येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण उपचार घेत आहे. कोडीत, वीर, नाझरे, जवळार्जुन, बोपगाव, माहूर, खळद, खानवडी येथील प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. वाल्हे, दौंडज, गराडे, पारगांव, भिवरी, उदाचीवाडी, परिंचे येथील प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. पुरंदर तालुक्यात एकूण १९३ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. सहा रुग्णांचा मृत्यू झाले होते. ८३ रुग्णांवर उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. तर १११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सोमेश्वर रिपोर्टरला शनिवारी संध्याकाळी पाच वाजता दिली आहे.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर सह पुणे जिल्ह्यात सोमवारी रात्री नंतर लॉकडाऊन होणार असल्याचे समजत आहे मात्र पुरंदरच्या तहसीलदारांना याबाबत अधिकृत व सविस्तर माहिती मिळाली असल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले आहे. मंगळवार १४ जुलै पासून पुढील दहा ते बारा दिवस लॉकडाऊन असणार आहे असे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी सांगितले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील कुठले तालुके या मध्ये असतील याबाबत संभ्रमावस्था आहे. जेजुरी शहरात रुग्णांची संख्या १४ झाली आहे. त्यामुळे जेजुरी शहरात लॉकडाऊन सक्तीचा करावा अशी मागणी पुढे येत आहे. तहसिलदार रूपाली सरनोबत यांनीही मुख्याधिकारी व इतर प्रशासकीय यंत्रणांना जेजुरी शहर परिसर लॉकडाऊन ठेवण्याबाबत कळवले आहे. याबाबत पुरंदर तालुक्यातील लोकांनी सोमेश्वर रिपोर्ट याबाबत सविस्तर माहिती मागितली होती. सोमेश्वर रिपोर्टरने पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आज रोजी पर्यंत पुरंदरच्या प्रशासनाला वरिष्ठांचे आदेश किंवा माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मिळाली की लगेच आपणाला कळविण्यात येईल असेही त्या पुढे म्हणाल्या.
COMMENTS