पवार कुटुंबीयांनी कधीही वैयक्तिक विरोध आणि खुनशी राजकारण केलं नाही- श्यामकाका काकडे- देशमुख
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथे श्यामकाका काकडे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, adv गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ आणि राहुलभैय्या काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्याम काका पुढे म्हणाले, सहकारमहर्षी मुगुटराव आप्पा काकडे यांना माळेगावच्या धर्तीवर सोमेश्वरला काऱखाना उभा करायचा होता. पुरंदर व बारामतीच्या लोकांना मध्यवर्ती पडावा म्हणून सोमेश्वरची निवड केली. मीदेखील १९७५ साली संचालक होतो. माझे एमएस्सी अॅग्री झाले होते. १९८५ साली मी साहेबराव सातकर यांच्याविरोधात पणन महामंडळाची निवडणूक लढविली तेव्हा विजय प्राप्त केला. त्यानंतर सलग ३५ वर्ष पणन महामंडळावर राहिलो. पणन महामंडळात राज्यातील दिग्गज असायचे. पुणे जिल्ह्यातून माझी निवड व्हायची. शरद पवार, अजित पवार यांनी मला नेहमी विरोध केला परंतु मी त्यांचीच मते घेत निवडून येत राहिलो. माझे सहकारात चांगले संबंध होते. १९९० साली मी पहिल्यांना पणन महामंडळाला उपाध्यक्ष झालो.
नीरा बाजार समितीलाही मी दहा वर्ष सभापती होतो. सभापती असताना अजितदादांनी पुरंदरच्या आमदारकीची ऑफर दिली होती. परंतु मला त्या प्रकारच्या राजकारणात रस नव्हता. सहकार सोडून कुठं जावं वाटलं नाही. पुणे जिल्हा खरेदी विक्री संघही मोठा कारभार असणारा होता. साखर, सिमेंट, खत याचे वाटप त्यामार्फत व्हायचे. परंतु हळूहळू ते व्यवसाय शासनाने स्वतंत्र करत नेले आणि संघाचा व्यवसाय संपला. राज्यात ३६४ संघ होते आता ३० संघच जिवंत आहेत. .शेतकऱ्यांना जिल्हा बँकांनी मदत केली पाहिजे. जमीनीची किंमत पंचवीस लाख रूपये एकर असते त्या जमीनीवर पन्नास हजार आणि एक लाखाचे कर्ज देतात. जमीनीच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम सरासरी चार पाच टक्के व्याजदराने शेतकऱ्याला दिली पाहिजे. तर शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सुटतील, कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्याला व्याजाने पैसे घेण्याची गरज पडणार नाही.
नीरा बाजार समितीलाही मी दहा वर्ष सभापती होतो. सभापती असताना अजितदादांनी पुरंदरच्या आमदारकीची ऑफर दिली होती. परंतु मला त्या प्रकारच्या राजकारणात रस नव्हता. सहकार सोडून कुठं जावं वाटलं नाही. पुणे जिल्हा खरेदी विक्री संघही मोठा कारभार असणारा होता. साखर, सिमेंट, खत याचे वाटप त्यामार्फत व्हायचे. परंतु हळूहळू ते व्यवसाय शासनाने स्वतंत्र करत नेले आणि संघाचा व्यवसाय संपला. राज्यात ३६४ संघ होते आता ३० संघच जिवंत आहेत. .शेतकऱ्यांना जिल्हा बँकांनी मदत केली पाहिजे. जमीनीची किंमत पंचवीस लाख रूपये एकर असते त्या जमीनीवर पन्नास हजार आणि एक लाखाचे कर्ज देतात. जमीनीच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम सरासरी चार पाच टक्के व्याजदराने शेतकऱ्याला दिली पाहिजे. तर शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सुटतील, कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्याला व्याजाने पैसे घेण्याची गरज पडणार नाही.
असा मार्गही शामकाका काकडे यांनी सुचविला. नीरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांना उपसा सिंचन योजना राबविण्यास आम्ही मदत केली. हळूहळू सगळ्या ठेवी परत करून संस्था स्वभांडवली केली आहे. तीन हजार सभासद फक्त शेतकरी आहेत व्यापारी नाहीत. वर्षाला आजही वीस लाखांची व्याजात सूट देतो. आता संस्था ३२ वर्षाची झाली आहे.
आमचे वडील साहेबराव काकडे यांनी १९११ साली तालुक्यातील पहिली सोसायटी स्थापन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार सुरू केला. बंधू मुगुटराव आप्पांनी १९६३ ला काऱखाना काढला. बाबांनीही त्यांच्यानंतर तो सक्षमपणे चालविला. नीरा खोऱ्यात सोमेश्वरचा भाव एक रूपया का होईना जास्त असायचा. तसेच विशिष्ट समाजाच्या ताब्यातून जिल्हा बँक बहुजन समाजाकडे आणण्यात मुगुटराव आप्पांचा मोठा वाटा होता. बाबालाल काकडे हे १९७३ साली बँकेला अध्यक्ष झाले होते. १९९० नंतर अजितदादांच्या ताब्यात बँक गेली. लालांचेही कर्तुत्व पुरोगामी विचारवंत म्हणून मोठे होते. ते विधानपरिषदेला आमदार होते. त्याशिवाय दोन वेळा खासदार झाले आहेत. ते समाजवादी पक्षात असताना शरद पवार यांना पाठींबा देऊन मुख्यमंत्री करण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. पवारसाहेबांनीही त्यांना शंकरराव पाटलांविरोधात खासदार व्हायला मदत केली. पवार कुटुंबातील एक असलेले गणपतराव पवार यांना देखील मझ्याकडून पराभव स्वीकारावा लागला असल्याची आठवण काकांनी आवर्जून सांगितली.
COMMENTS