नीरा खो-यातील भाटघर धरण भरण्याच्या मार्गावर : ९७.२० टक्के पाणीसाठा
नीरा : प्रतिनिधी
नीरा खो-यातील भाटघर , नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस असल्यामुळे यंदा गत वर्षापेक्षा धरणे भरण्यास उशीर झाला आहे. मात्र नीरा देवघर व भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेेेत्रात सोमवारी (दि.१७) दिवसभरात ६७ मि.मी.पाऊस पडल्याने भाटघर धरण मंगळवारी (दि.१८) संध्याकाळी पाच वाजता ९७.२० टक्के भरल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. दरम्यान, भाटघर धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे.
मागील तीन- चार दिवसांपाासून नीरा खो-यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी- अधिक
राहिल्याने मंगळवारी (दि.१८) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नीरा देवघर धरण ८७.३६ टक्के भरले आहे. तर भाटघर धरण ९७.२० टक्के भरून १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. तर वीर धरण ९४.२६ टक्के व गुंजवणी धरण ९४.०३ टक्के भरले आहे.
दरम्यान, गत वर्षी या दिवशी नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणांत ४८.२१६ टि.एम.सी पाणी साठा उपलब्ध होऊन चारही धरणे ९९.७७ टक्के भरलेली होती. मात्र यंदा या चारही धरणांत ४५.४२९ टि.एम.सी. पाणी साठा असून ही धरणे ९३.९९ टक्के झाली आहेत.
नीरा खो-यातील नीरा देवघर धरण साखळीत मंंगळवारी (दि.१८) सकाळी सहा वाजले पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १४ मि.मी.पाऊस झाल्याची नोंद झाली असून भाटघर धरण साखळीत ४ मि.मी.पाऊस झाल्याची नोंद आहे. वीर धरण साखळीत शुन्य मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच गुंजवणी धरण साखळीत २७ मि.मी.पावसाची नोंद झाली. त्यामुळे नीरा खो-यातील चारही धरणांत ४५ मि.मी. पाऊस झाल्याने वीर धरणात येणा-या पावसाच्या पाण्याची आवक कमी होऊ लागली.
त्यामुळे वीर धरणातून टप्या- टप्याने पाण्याचा विसर्ग कमी करून मंगळवारी (दि.१८) संध्याकाळी उशिरा पर्यंत ८ हजार ९५६ क्यूसेक्स वीर धरणातून व वीज निर्मिती केंद्रातून ५००क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू होता. मात्र, वीर धरणातून नीरा उजव्या कालव्यातून ८०२ क्युसेक्सने व नीरा डाव्या कालव्यातून २०० क्युसेक्सने सद्या विसर्ग सुरू आहे.
COMMENTS