आठवण सांगली कोल्हापूरच्या पुराची : सोमेश्वरकरांनी केली होती मदत प्रत्येक घराची
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या वर्षी ५ ऑगस्ट २०१९ ला सांगली आणि कोल्हापूर भागातील शेकडो गावांना पुराच्या पाण्याने वेधले होते. यामध्ये घरे, शेती, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी बारामतीच काय अख्खा महाराष्ट्र हा दोन जिल्ह्याच्या मदतीला धावून आला होता. आज याला एक वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून मागील आठवणींनी थोडासा उजाळा देण्याचा प्रयत्न...
सांगली जिल्ह्यातून गेलेली कृष्णा आणि कोल्हापूर जिल्ह्यातुन गेलेली पंचगंगा या दोन नद्यांच्या पुराच्या पाण्याने आपल्या कवेत घेतले होते. लाखो संसार उघड्यावर पडले, शेकडो गावे पाण्याखाली गेली, लाखो हेक्टर वरील जमिनी वाहून गेल्या, पिके वाहून गेली, हजारो जनावरे बुडाली, होत्याच नव्हत झालं...वाचलेली जनावरे गळ्यापर्यंत पाण्यात उभी होती, लहानंमुलं घराच्या छपरावर चार दिवस उपाशी होती. घरातली भांडी, कपडे, धान्य, चिमुरड्या ची शाळेची दप्तरं, काही राहील नाही. नद्यांनी आपले प्रहावच बदलल्याने नदीकाठची शेकडो एकर जमिनी वाहून गेल्या..पीक गेली. लाईटचे खांब सुद्धा राहिले नाहीत. होत्याच नव्हतं झाला आणि या घटनेने महाराष्ट्र निःशब्द झाला.
सगळीकडे पाणीच पाणी असल्याने सरकारी मदत पोहचवता येत नव्हती. का सरकारला पोहचवायची नव्हती हा देखील प्रश्न होताच.. खासदार, आमदार, पोलीस, मिलिटरी सामजिक संस्था मदतीला धावल्या. हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घातले.
१० ऑगस्ट नंतर पूर ओसरू लागला, त्यांना पहिली गरज होती ती अन्न आणि पाण्याची.... राज्यशासन तिथपर्यंत पोहचल नव्हतं. शासनाची वाट न पाहता
मुंबई पुणे आणि बारामतीच्या सामजिक संस्थांनी मदतीचे आवाहन केली. टीव्हीच्या बातम्या पाहून लोकांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या वरच संकट ओलढवले आहे असे समजून प्रत्येक घरातून मदत यायला लागली. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वजण यात सहभागी झाले, व्हाट्स अप ग्रुप तयार झाले मदतीचे मेसेज फिरू लागले. यात शेतकरी, ग्रामस्थ, महाविद्यालयीन युवक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, पोलीस, पत्रकार, राजकीय पदाधिकारी, गृहिणी सर्वांनीच मोलाचे योगदान दिले.
कोणी धान्य, कोणी धान्याचं पिठ, कोणी तेल तर कोणी मीठ... कोणी पाण्याचे बॉस, कोणी कपडे, कोणी तांदूळ दिले. महिलांनी तर घरातल्या नव्या साड्या दिल्या. या पुरग्रस्तांसाठी छोट्यातल्या छोट्या माणसाने मदत केली होती. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील काही युवकांनी एकत्र येत एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून ही मदत गोळा होऊ लागली. वस्तूंच्या शॉटिंग करायला शेकडो हात रात्र दिवस कामाला लागले. ११ ऑगस्ट ला एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन ने अन्नधान्याचे दोन ट्रक भरले, १२ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एक ट्रक सांगली आणि एक ट्रक कोल्हापूर ला रवाना केला. तिथे गेल्यावर समजले की अन्ना पेक्षा त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची जास्त गरज आहे. कारण पुरामुळे नदीकाठच्या पाणी दूषित झाले होते. एक हात मदतीच्या सोशल फाउंडेशन ने दोनच दिवसात लोकांच्या सहकार्याने एक पाण्याच्या बाटल्यांचा टेम्पो तर एक जनावरांच्या चाऱ्याचा असे दोन टेम्पो पुरग्रस्तांसाठी रवाना केले.
COMMENTS