वाहतुक संघटनेने सहकार्य करत पुकारलेला बंद मागे घ्यावा, निश्चित तोडगा काढू : पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चालु गळीत हंगामामध्ये आजअखेर ५.३७ लाख मे.टन ऊसाचे गाळप झालेले असुन अजुन ७ ते ७.२५
लाख मे.टन ऊस गाळप करावयाचा आहे. यावर्षी अतिरीक्त ऊसाचा गंभीर
प्रश्न आपणासमोर असुन वेळेत गाळप पुर्ण करणे जिकरीचे होणार आहे.
कारखाना सध्या ६००० ते ६३०० मे.टन प्रतिदिन क्षमतेने गाळप करीत असुन अतिरीक्त ऊस इतर कारखान्यांना देणेसाठी प्रयत्न चालु आहेत. असे असताना कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीचे काम सांभाळणा-या श्री सोमेश्वर ट्रक
ट्रॅक्टर वाहतुक संघटनेने दोन वेळा निवेदन देवुन वाहतुक दरवाढ मागितली आहे. व दरवाढ न दिल्यास दि.२७ जानेवारी २०२१ पासुन ऊस वाहतुक बंद
करणेत येईल असे पत्र कारखान्यास दिले आहे. यावर संचालक मंडळात चर्चा होवुन भागातील माळेगाव व छत्रपती या कारखान्यासह राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी याबाबत तिन्ही कारखान्यांचे अध्यक्षांसोबत चर्चा घडवुन ऊस वाहतुक दरवाढीचा निर्णय लवकरात लवकर
घेतला जाईल. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गाळपास आणणेसाठी
वाहतुक संघटनेने सहकार्य करावे व पुकारलेला बंद मागे घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
COMMENTS