सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------
पुरंदर तालुक्यातील शेतीला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन योजना सोमेश्वर कारखाना चालविण्यास घेणार आहे. याबाबतची प्रकिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पाणी वितरण, देखभाल दुरुस्ती, पाणीपट्टी वसुली यासर्व बाबी कारखाना पातळीवर पहिल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला आता वेळेवर पाणी मिळणार असल्याची माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
या योजनेमुळे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेकडो एकरांवर क्षेत्र ओलीताखाली येणार असून उसाबरोबरच अन्य पिकांची वाढ होणार आहे. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने या अगोदरही पाण्याची विविध योजना राबवत शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, आंबळे, राजेवाडी, नायगाव, भोसलेवाडी, नाझरे सुपे, मावडी कप, माळशिरस, वाघापुर, खानवडी, मुंजवडी, पारगाव या गावातील शेतीला फायदा होणार आहे तर बारामती तालुक्यातील जोगवडी, मुर्टी, मोरगाव, पळशी, मोराळवाडी, माळवाडी, लोणी, भिलारवाडी, मासाळवाडी या गावांना फायदा होणार आहे. या गावातील क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याने सोमेश्वर कारखान्याचे उसाचे क्षेत्र वाढणार आहे. पर्यायाने कारखान्याचे गाळप वाढणार असून विस्तारीकरण काळाची गरज असल्याचे मत या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS